शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ग्रामसेवकाविरोधात मोर्चा, आलोंडा ग्रामपंचायतीला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:19 IST

विक्रमगड तालुक्यातील आलोंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला.

तलवाडा - विक्रमगड तालुक्यातील आलोंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला.एकीकडे प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल व काम करणाऱ्यास दाम मिळेल असे शासनाचे धोरण असताना ग्रामसेवकांने रोजगार हमीतून कामे करुनही मजुरांना मजुरी देत नसल्याचे येथे उघड होत आहे. तसेच, सर्व-सामान्य नागरिकांनी घरे बांधुन त्यास घरपट्टी लागू करण्यासंदर्भात मागणी करुनही त्या दिल्या जात नाहीत, विविध विकास कामे वेळकाढू पणामुळे अपूर्णावस्थेत आहेत. अशा अनेक कामामध्ये ग्रामसेवक आपली मनमानी करीत असल्याचे लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाही होत नसल्याने श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले. या संदर्भामध्ये संघटेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.दरम्यान, इशारा देऊनही त्यावर उपाय योजना होत नसल्याने अखेर सोमवारी आलोंडा ग्रामपंचायतीवर ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारा विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकºयांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल चार तास धरणे आंदोलन केले. अखेर सर्व कामे करण्याचे ग्रामसेवकानी लेखी आश्वासनासह तत्काळ १५ लोकांना घरपटी दिल्यानंतर व विहिरी साफ केल्याचे वीस हजार पाचशे रुपये अदा केल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला़तुषार सांबरे, रुपेश डोले यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीसी कैलास तुंबडा, तालुका अध्यक्ष शंकर भोये, महिला जिल्हा उपाध्यक्ष सविता कासट, माजी तालुका अध्यक्ष गंगाराम वरठा,कामगार संघटना सचिव पौर्णिमा पवार, महिला सचिव गिता लोहार, शहरप्रमुख मेहुल पटेल, युवा सचिव लवेश कासट यांसह असंख्य महिला व पुरुष कार्यकते उपस्थित होते.सर्व कामे पूर्ण होतील दिले आश्वासनग्रामसेवकानी दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये वृक्ष लागवडीचे ३० हजार २० आॅगस्ट पर्यंत व पुढील दोन महिन्यात २० हजार रुपये अदा करण्यात येतील, स्वत:ची जागा असेल तर जागेच्या पुराव्यावर शासनाच्या जीआरप्रमाणे घरपट्टया देण्यात येतील, अपूर्ण कामे पुर्ण करण्याबाबत या सर्व दुरुस्ती करणे व अपुर्ण कामे पुर्ण करणे आदी आश्वासने दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या