शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ओएनजीसी दोन पावले माघारी : आंदोलनानंतर सर्व्हेक्षण स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:37 IST

ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात डहाणू ते उत्तन भागातील मच्छीमारांनी एकजुटीचे दर्शन घडवून केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन समुद्रातील सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे ओएनजीसीने मान्य केले आहे.

पालघर - ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात डहाणू ते उत्तन भागातील मच्छीमारांनी एकजुटीचे दर्शन घडवून केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन समुद्रातील सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे ओएनजीसीने मान्य केले आहे.भूगर्भातील तेल व गॅसच्या साठ्यांचा शोध घेण्याचे काम १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. समुद्रात एका महाकाय जहाजाद्वारे ५६ दिवसांच्या मोठ्या कालावधीसाठी होणाऱ्या या सर्व्हेमुळे मच्छिमारांचा मासेमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा भागच प्रतिबंधित करण्यात आला होता. त्यामुळे मागील एक महिन्यापासून किनारपट्टीवरील सर्व बोटी किनाºयावर पडून राहिल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते.या सर्वेक्षणाआधी मच्छीमारांना विश्वासात न घेता त्यांच्यावर सर्वेक्षण लादले जात असल्याच्या निषेधार्थ १४ जानेवारी रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने संतप्त मच्छीमारांनी १ फेब्रुवारी रोजी आपल्या शेकडो बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणाच्या ठिकाणी निदर्शने करीत सत्ताधाºयांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. तसेच जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांसमोर काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला होता.या पार्श्वभूमीवर सोमवारी (४ फेब्रुवारी) बांद्रा येथील प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ओएनजीसीचे अधिकारी एस. के. शर्मा, व्यवस्थापक एस. सी. मीना, सर्वेक्षण अधिकारी बी. के. महापात्रा, उपायुक्त यु. ए. चौगुले, ठाणे मच्छीमार संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, सुभाष तामोरे, राजन मेहेर, झुजू धाकी आदींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ओएनजीसीकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणामुळे मच्छिमारांच्या दैनंदिन उत्पन्नावर होणारा परिणाम, या सर्वेक्षणा दरम्यान त्यांना विश्वासात न घेता सर्वेक्षण लादले जाणे, नुकसान भरपाई न मिळणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली होती. यावेळी प्रथम सर्वेक्षण बंद करा, झालेल्या नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय द्या, नंतरच चर्चा करू असा पवित्रा मच्छीमारांनी घेतला. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे अधिकाºयांनी सांगितले.मंगळवारी बैठकसेसमिक सर्वेक्षण करण्याआधी समुद्री मत्स्यकी संशोधन केंद्राचे परवानगी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित करून भूगर्भातील स्फोटामुळे जैवविविधता, मत्स्यबीजे नष्ट होत असल्याने याला जबाबदार कोण?१२ फेब्रुवारी रोजी मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तो पर्यंत समुद्रातील सर्वेक्षण बंद ठेवण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती राजन मेहेर यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार