शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

ओएनजीसी दोन पावले माघारी : आंदोलनानंतर सर्व्हेक्षण स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:37 IST

ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात डहाणू ते उत्तन भागातील मच्छीमारांनी एकजुटीचे दर्शन घडवून केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन समुद्रातील सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे ओएनजीसीने मान्य केले आहे.

पालघर - ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात डहाणू ते उत्तन भागातील मच्छीमारांनी एकजुटीचे दर्शन घडवून केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन समुद्रातील सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे ओएनजीसीने मान्य केले आहे.भूगर्भातील तेल व गॅसच्या साठ्यांचा शोध घेण्याचे काम १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. समुद्रात एका महाकाय जहाजाद्वारे ५६ दिवसांच्या मोठ्या कालावधीसाठी होणाऱ्या या सर्व्हेमुळे मच्छिमारांचा मासेमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा भागच प्रतिबंधित करण्यात आला होता. त्यामुळे मागील एक महिन्यापासून किनारपट्टीवरील सर्व बोटी किनाºयावर पडून राहिल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते.या सर्वेक्षणाआधी मच्छीमारांना विश्वासात न घेता त्यांच्यावर सर्वेक्षण लादले जात असल्याच्या निषेधार्थ १४ जानेवारी रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने संतप्त मच्छीमारांनी १ फेब्रुवारी रोजी आपल्या शेकडो बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणाच्या ठिकाणी निदर्शने करीत सत्ताधाºयांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. तसेच जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांसमोर काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला होता.या पार्श्वभूमीवर सोमवारी (४ फेब्रुवारी) बांद्रा येथील प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ओएनजीसीचे अधिकारी एस. के. शर्मा, व्यवस्थापक एस. सी. मीना, सर्वेक्षण अधिकारी बी. के. महापात्रा, उपायुक्त यु. ए. चौगुले, ठाणे मच्छीमार संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, सुभाष तामोरे, राजन मेहेर, झुजू धाकी आदींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ओएनजीसीकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणामुळे मच्छिमारांच्या दैनंदिन उत्पन्नावर होणारा परिणाम, या सर्वेक्षणा दरम्यान त्यांना विश्वासात न घेता सर्वेक्षण लादले जाणे, नुकसान भरपाई न मिळणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली होती. यावेळी प्रथम सर्वेक्षण बंद करा, झालेल्या नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय द्या, नंतरच चर्चा करू असा पवित्रा मच्छीमारांनी घेतला. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे अधिकाºयांनी सांगितले.मंगळवारी बैठकसेसमिक सर्वेक्षण करण्याआधी समुद्री मत्स्यकी संशोधन केंद्राचे परवानगी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित करून भूगर्भातील स्फोटामुळे जैवविविधता, मत्स्यबीजे नष्ट होत असल्याने याला जबाबदार कोण?१२ फेब्रुवारी रोजी मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तो पर्यंत समुद्रातील सर्वेक्षण बंद ठेवण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती राजन मेहेर यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार