शहरं
Join us  
Trending Stories
1
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
3
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
4
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
5
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
6
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
7
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
8
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
9
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
10
वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी
11
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
12
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
13
ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'
14
शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग, निफ्टी-सेन्सेक्स ऑल टाईम हाय लेव्हलवर
15
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी
16
पाकिस्तानच्या बाबरच्या राजीनाम्याची मागणी; पण त्याच्या समर्थनार्थ भारतीय दिग्गज मैदानात
17
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?
18
T20 WC 24, WI vs AFG  : एकाच षटकात ३६ धावा! निकोलस पूरनने रचला इतिहास, शतक मात्र हुकले
19
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू
20
Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ

गारगाई प्रकल्पामुळे एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:58 AM

शेतकऱ्यांना नोटिसा : जमीन संपादनाची कार्यवाही सुरू; पुनर्वसनाचे आश्वासन

वाडा : मुंबई शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी वाडा तालुक्यात उभारण्यात येणाºया गारगाई प्रकल्पामुळे येथील जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत. ही सर्व कुटुंबे आदिवासी समाजाची आहेत. या प्रकल्प क्षेत्रात खासगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून तशा प्रकारची नोटीस शेतकऱ्यांना देऊन जमीन संपादनाबाबत मुंबई महानगर पालिकेने विविध वर्तमानपत्रातून जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत.मुंबईला दररोज ४४० दशलक्ष ली. अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात हा गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील विस्थापित होणाºयांमध्ये ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर या महसुली गावांसह चार ते पाच अन्य पाड्यातील कुटुंबांचा समावेश आहे. तर मोखाडा तालुक्यातील आमले गावातील सर्व कुटुंबे विस्थापित होणार आहेत.या प्रकल्पामुळे एकूण ११०० हेक्टर जमीन धरणाखाली येणार आहे. या जमिनीमधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्याने तानसा अभयारण्याला या धरणाचा मोठा फटका बसणार आहे. या धरणासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील हजारो वृक्ष संपदेवरही होणार आहे. विस्थापित होणाºया सर्व कुटुंबियांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातील हरोसाळे आणि देवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळ असलेल्या वनजमिनीवर होणार आहे.ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर प्रकल्पनदीवर हा प्रकल्प होत आहे. ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या गारगाई धरणाच्या जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून ते गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरविण्यात येणार आहे. यासाठी गारगाई ते मोडकसागर दरम्यानचे २.० किलोमीटर लांबीच्या बोगद्याचेही काम केले जाणार आहे.गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे ४२४ हेक्टर खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित सर्व कुटुंबांचे पुनवर्सन, आवश्यक परवानग्या याची कार्यवाही मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे विस्थापित होणाºया आम्हा कुटुंबियांना शेतजमीनीचा योग्य मोबदला तसेच सर्व सोयी, सुविधा देवून पुनर्वसन केले पाहिजे.-गणपत बुधाजी कोरडे, पोलीस पाटील, ओगदा.पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसानासाठी येथील बाधीत कुटुंबियांना ज्या सुविधा व मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे ते मिळणार असेल तर आमचा विस्थापित होण्याला विरोध नाही.- गणपत दोडे, माजी सरपंच, ओगदा ग्रामपंचायत