शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ऑन द स्पाॅट: गुजरातनेच सांभाळायचे का पालघरच्या आदिवासींचे आराेग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 07:36 IST

जिल्ह्यातील अभद्र युतीमुळे आराेग्य यंत्रणा सुधारेना

हितेन नाईक

पालघर : जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोहाेचत नसल्याने झोळीतून उपचारासाठी नेताना होणारे मृत्युसत्र आजही थांबता थांबत नाही. सर्पदंश आणि प्रसूतीनंतर काही तासात महिलेचा होणारा मृत्यू एकूणच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. त्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाला एक तर खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो किंवा गुजरात राज्यातील वापी, वलसाड आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासाकडे वळावे लागत आहे. 

पालघर ग्रामीण रुग्णालयात साप चावलेल्या एका ३२ वर्षीय महिलेला मृत्यूला सामोरे जावे लागले होते, तर बुधवारी एका २९ वर्षीय तरुणीची यशस्वी प्रसूती झाल्यावर काही तासातच ती अत्यवस्थ झाल्याने तिला सिल्वासा येथे नेताना ऑक्सिजन सिलिंडर सेवा नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. 

जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड, तलासरी, डहाणू तालुक्यातील हजारो रुग्णांना वापी, वलसाड, सिल्वासामधील आरोग्य सेवा कमी त्रासदायक, कमी खर्चिक आणि विश्वासपात्र वाटू लागल्याने त्या भागाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. मुंबई आणि ठाणे येथील रुग्णालयात रुग्णाला तत्काळ दाखल करण्याऐवजी गुजरातकडे वळणे पसंत करतो.    जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय आणि लॅब सेवा, मेडिकल दुकाने यांची अंतर्गत अभद्र युती रुग्णांचे आर्थिक शोषण करण्यासाठी एकत्र येत असल्याचा आरोप केला जात आहे.

आरोग्य यंत्रणेची अशी आहे स्थितीवसई - विरार महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सकअंतर्गत डहाणू, जव्हार आणि कासा अशी तीन उपजिल्हा रुग्णालये, एक आश्रम पथक आणि पालघर, मनोर, बोईसर, तलासरी (आश्रमशाळा पथक), वाणगाव, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि विरार अशी नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. 

अनेक पदे अद्यापही रिक्तपालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून १८ प्राथमिक आरोग्य पथके, नऊ जिल्हा परिषद दवाखाने, ३१२ इतकी उपकेंद्र आहेत. या केंद्रांत एकूण २,०७६ मंजूर पदे असून १,०१० पदे भरण्यात आली असून कंत्राटी पद्धतीने अन्य ५८७ पदे भरली असल्याने ४७६ पदे रिक्त आहेत. तर अन्य क, ड वर्गातील ५७४ मंजूर पदांपैकी ५०५ पदे भरण्यात आली असून ६९ पदे रिक्त आहेत.