शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

विरार कार्यालयात टेस्ट ट्रॅक अभावी जुन्या वाहनांचे पासिंग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 2:58 AM

पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.

वसई : पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.या संदर्भात राज्य सरकारने त्वरीत लक्ष घालून जुन्या वाहन चालकांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विनायक निकम आणि त्यांच्या शिष्टमंडळाने उप- प्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे.हा प्रश्न त्वरीत मार्गी लागला नाही, तर पालघर जिल्ह्यातील सर्व वाहनचालक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा हि निकम यांच्या वतीने आर.टी.ओ ला नुकताच देण्यात आला.पासिंगसाठी कल्याण गाठावे लागत असल्याने जिल्हावासियांच्या वेळ, पैसा याचा अपव्यय हो असून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होत असून त्यांची मोठी दमछाक होते आहे.आधीच कल्याण हे शहर वसई सारखेच मोठ्या महापालिकेचे शहर असल्याने याठिकाणी सुद्धा हजारो वाहने पासींग करण्यासाठी गर्दी करत असतात, त्यामुळे एकदा त्याठिकाणी गेल्यावर साधारण पंधरा ते वीस दिवसां नंतरची तारीख मिळते. परिणामी वाहनचालकास एका खेपेच्या कामासाठी तब्बल दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागतात.कल्याण येथे वाहने पासींग करण्यासाठी आठवडयातून एकच रविवारचा दिवस मिळत असल्यामुळे वाहनांची पासिंग वेळीच होऊ शकत नाही. आणि ती वेळीच झाली नाही तर अशी वाहने रस्त्यावर येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागतो.वाहनांच्या दैनंदिन धंद्यावर या टेस्ट ट्रॅक बंदचा परिणाम होत असून वाहनचालक स्वत:च्या गाडीच्या कर्जाचा हप्ता ही वेळेवर भरू शकत नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुहेरी कात्रीत सापडलेल्या वाहन चालकाने गाडी रस्त्यावर आणल्यास अपघात झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अथवा विमा त्यास मिळू शकणार नाही.त्यामुळे या समस्येस नेमके जबाबदार कोण? असा सवालच चालकांनी विचारला आहे.भूखंडाच्या मालकीचामुद्दा न्यायप्रविष्टपालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आर्.टी.ओ. कार्यालयासाठी गवराईपाडा, गोखिवरे पूर्व येथे राज्यशासनाने भूखंड दिलेला आहे. परंतु आज ही ह्या जागेच्या मालकीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थीतीत पालघर जिल्ह्यातील वाहन चालकां वरती या समस्येची कुºहाड किती दिवस टांगती राहणार आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर मात्र आरटीओकडे नाही.आरटीओ अनिल पाटीलांची चलाखी(या मोबाईल क्रमांकावर इनकमिंग कॉल्स ची सुविधा उपलब्ध नाही .)वसईतील विविध माध्यमाच्या पत्रकारांकडून विरार आर.टी.ओ संदर्भात प्रतिक्रि या विचारण्यासाठी काही वेळा मोबाईलवर फोन केले जातात. मात्र आता विरार आर टीओ अनिल पाटील यांनी आपला मोबाईल हा केवळ आऊटगोर्इंग मध्ये ठेवला असून फक्त पत्रकारांचे येणारे फोन हे बंद केलेल्या इनकमिंग मोडमध्ये ठेवले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार