शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग; १९ सप्टेंबरला पूल वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:16 IST

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरु झालेला जुना वरसोवा पूलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टींग केली जाणार आहे. पूल सहा तासापर्यंत बंद ठेवण्यात येणार असून चार महिन्यांपासून सुरु करण्यात आलेल्या पूलाची क्षमता तपासली जाणार आहे.

- शशी करपे ।वसई : आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरु झालेला जुना वरसोवा पूलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टींग केली जाणार आहे. पूल सहा तासापर्यंत बंद ठेवण्यात येणार असून चार महिन्यांपासून सुरु करण्यात आलेल्या पूलाची क्षमता तपासली जाणार आहे.मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ४८.५ मीटर लांबीच्या जुन्या वरसोवा पूलाला ४३ वर्षे उलटून गेली आहेत. २०१४ साली पूलाच्या एका गर्डरला तडा गेल्यापासून या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यावेळी नवीन गर्डर बसवण्याच्या कामासाठी तब्बल सहा महिने लागले होते. तेव्हापासून पूल कमकुवत असल्याने दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार बंद करण्यात येत आहे. गर्डर बदल्यानंतर पूल पुन्हा नादुरुस्ती झाल्याने १६ सप्टेंबर २०१६ ते १८ मे २०१७ पर्यंत पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. याकाळात नव्या पूलावरून एकेरी वाहतूकीची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होऊ़न वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागून वाहनचालकांना अडकून पडावे लागत होते. या पूलाची दुरुस्ती लवकर करून वाहनांसाठी खुला करण्यात यावा यामागणीसाठी विविध पक्षांना रास्ता रोको आंदोलनेही केली होती.१९ मेपासून हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला आहे. मात्र, आता याच पूलावरून हलक्या आणि जड वाहनांसाठी वेगवेगळ््या रांगा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा पूल जड वाहनांच्या वाहतूकीसाठी कितपत टिकेल असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. नेमका आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या पूलाची वेट टेस्टींग घेण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून टेस्टींग सुरु करण्यात येणार आहे. ही चाचणी सहा तास चालणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सकाळी ८ वाजल्यापासून चाचणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.जुन्या पूल अवजड वाहनांसाठी कितपत योग्य आहे, याबाबची क्षमता या चाचणीद्वारे तपासण्यात येणार आहे. चार महिन्यात अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे पूल कमकुवत तर होत नाही ना याचीही खात्री या चाचणीतून केली जाणार आहे. या चाचणीत काही दोष आढळून आला तर मात्र पूलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता एका अधिकाºयाने व्यक्त केली आहे.नव्या पुलावरून वाहतूक मॅनेजमेंटजुना पूल बंद करण्यात आल्यानंतर नव्या पूलावरून दोन्ही बाजूची वाहतूक पंधरा पंधरा मिनिटांच्या फरकाने टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे. पूल बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी होती. तसेच रस्ताच्या विरुद्ध दिशेने मोठया प्रमाणात हलकी आणि अवजड वाहने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. तसेच समोरासमोर वाहने येऊ़न वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या अनुभव लक्षात घेऊन महामार्ग वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वरसोवा खाडी पूल, जी. एन. मोटेल, रॉयल गार्डन, एस. पी. धाबा, लोढा धाम व चिंचोटी नाका या सात ठिकाणी नाके तयार करण्यात येणार आहेत. यावेळी ७५ पोलीस कर्मचारी, ५० बॅरीकेटस आणि २०० कोन वाहतूकीचे नियमन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.