शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जुन्या पेन्शन योजनेसाठी केले मुंडन , तलासरीमध्ये शिक्षकांना आक्रोश : १९८२-८४ चे धोरणच कर्मचारी हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:19 IST

१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक अंशदायी पेंशन योजना लागू केलेली आहे. ती बंद करून १९८२-८४ ची जुनी निवत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मुंडण व आक्र ोश महामोर्चाचे आयोजित करण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी तलासरी तालुक्यातील शिक्षक कर्मचाºयांनी सामुहिक मुंडण करुन रविवारी शासकीय धोरणाचा निषेध केला.

तलासरी : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक अंशदायी पेंशन योजना लागू केलेली आहे. ती बंद करून १९८२-८४ ची जुनी निवत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मुंडण व आक्र ोश महामोर्चाचे आयोजित करण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी तलासरी तालुक्यातील शिक्षक कर्मचाºयांनी सामुहिक मुंडण करुन रविवारी शासकीय धोरणाचा निषेध केला.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना ऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत समाविष्ट कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा शासनाने दिलेली नाही.एखादा कर्मचारी मयत झाल्यास त्या कर्मचाºयाचे संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना या महाराष्ट्राने अनुभवल्या आहेत. यासाठी सर्वप्रथम १४ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर सुमारे साठ हजार कर्मचाºयांनी, त्यानंतर १५ मार्च २०१६ रोजी मुंबई अधिवेशनावर एक लाख कर्मचाºयांनी आक्रोश मोर्चा काढून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. पुढे शासनाने मृत कर्मचाºयांना आर्थिक मदत करण्यासाठी समिती नेमली. परंतु कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना नाकारली. त्याचवेळी मात्र उत्तराखंड, राजस्थान उत्तरप्रदेश आदी राज्यांनी आपल्या एनपीएस धारक कर्मचाºयांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू केली. इतर राज्ये जुनी पेन्शन योजना लागू करत असताना महाराष्ट्र शासनाला डीसीपीएस /एनपीएस धारक मृत कर्मचाºयांच्या परिवारांच्या अश्रूंची दखल घेण्याची गरज वाटत नाही. २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना बंद करून शासनाचे समाधान झाले नसून त्यांना १२ व २४ वर्षे पूर्ण होताच मिळणाºया वेतनश्रेणीसाठी जाचक अटी टाकल्या आहेत. या सर्व अन्यायकारक बाबींचा निषेध करण्यासाठी, शासनाने पुन्हा एकदा आपल्या मागण्यांवर विचार करावा याकरिता रविवारी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मुंडण आक्र ोश महामोर्चा आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळपास ५० हजार कर्मचारी नागपूर येथे १९८२-१९८४ ची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी मुंडण आक्र ोश महामोर्चात सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने या मोर्चाला संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आपल्या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी तलासरी तालुक्यातील जवळपास ३०० कर्मचारी यांनी सामुहिक मुंडण केले. त्यामुळे तालुक्यात ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ याची चर्चा रंगताना दिसली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या मोर्चाला प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षक सहकार संघटना यांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :Teacherशिक्षक