शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

तेल तवंगाने किनारे विद्रूप, पर्यावरणाला धोका, प्लॅटफॉर्म व कंटेनरमधून फेकल्या जाणाऱ्या क्रूडच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:12 IST

- हितेन नाईक पालघर : ओएनजीसी तेलशुद्धीकरण प्रकल्पासह समुद्रातून जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनरमधून फेकण्यात येणाºया क्रूड आॅइलचे तवंग व थर जिल्ह्यातील सर्व सागरीक्षेत्रात पसरल्याने मोठ्या प्रमाणात माशांची नष्ट झालेली अंडी किनाºयावर येवून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास धोक्यात आला आहे.ओएनजीसी प्रकल्पांतर्गत समुद्रात तेल व वायू साठ्यांच्या सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात ...

- हितेन नाईक पालघर : ओएनजीसी तेलशुद्धीकरण प्रकल्पासह समुद्रातून जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनरमधून फेकण्यात येणाºया क्रूड आॅइलचे तवंग व थर जिल्ह्यातील सर्व सागरीक्षेत्रात पसरल्याने मोठ्या प्रमाणात माशांची नष्ट झालेली अंडी किनाºयावर येवून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास धोक्यात आला आहे.ओएनजीसी प्रकल्पांतर्गत समुद्रात तेल व वायू साठ्यांच्या सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले असून केंद्र सरकारने मच्छीमारांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने ओएनजीसी सोबत नियुक्त केलेल्या कमिटीत या सर्वेक्षणाबाबतचे निर्णय विचारविनिमयाने घेण्यात येत असत. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी या कमिटीची स्थापना केली होती. परंतु मागील काही वर्षांपासून समुद्रात सर्वेक्षण करतांना ओएनजीसीचे अधिकारी या कमेटीला विश्वासात घेत नाहीत. या महाकाय बोटींद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणामुळे समुद्रातील मोठा भाग प्रतिबंधित ठरवून त्या भागात मासेमारी करण्यापासून मच्छीमाराना वंचित ठेवले जाते. परिणामी त्यांचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय समुद्रात उभारलेल्या अनेक महाकाय प्लॅटफॉर्म वर सुरु असलेल्या तेल उत्खननामधून गळतीद्वारे मोठ्याप्रमाणात कच्चे आॅइल समुद्रात पडून त्याचे गोळे होतात व ते वाहून किनारपट्टीवर जमा होतात. नंतर त्यांचे ढिग तयार होतात.या तेल उत्खनन आणि तेलाची वाहतूक करणाºया महाकाय जहाजाची स्वच्छता समुद्रात करतांना त्यातील आॅईल मोठ्याप्रमाणात समुद्रात फेकले जात असून त्यामुळे होणाºया प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. समुद्रातील तवंगामुळे मत्स्यबीजांची हानी होत असून खाड्यामधील कालवे, शिंपले, चिंबोरी, बोय आदींचे प्रमाण कमी होते आहे. या स्वरुपाची जी मच्छी हाती येते तिला तेलाचा वास येत असल्याने तिची मागणी घटू लागली आहे. त्यामुळे खाड्यातील मत्स्यसंपदेवर आपला उदरिनर्वाह करणारी अनेक आदिवासी, गरीब कुटुंबे रोजगारीहिन होणार आहेत.पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या केळवे, बोर्डी, माहीम, अर्नाळा, कळंब, शिरगाव, सातपाटी, एडवन आदी सुंदर किनारपट्टीवर पर्यटन वाढीला वाव असल्याने विकास आराखडा बनवला आहे. या पर्यटन विकासासाठी पालकमंत्र्यांनी लाखो रुपयांची तरतूद केली असून केळवे, शिरगाव येथे पर्यटकांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. या पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशावेळी वसई तालुक्यातील किनारपट्टीपासून ते थेट डहाणू तालुक्यातील झाई-बोर्डीच्या किनाºयावर हे डांबरचे गोळे मोठ्याप्रमाणात लागले आहेत. हे तेल समुद्रात पोहायला उतरणाऱ्या पर्यटकांच्या अंगालाही चिकटते. किनाºयावर फिरायला जाणाºयांच्याही पायलाही ते चिटकत असल्याने पर्यटक या किनाºयांपासून दूरावण्याची भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे प्रदूषण थांबविणारी उपाययोजना करण्याची गरज आहे....तर हरित लवादाकडे याचिकाकिनारपट्टीवर स्वच्छता मोहीम आखून हा कचरा साफ करून उपाययोजना आखायला हव्यात किंवा सहकारी संस्था, संघटना यांना हे प्रदूषण करणाºयां विरोधात याचिका दाखल करता येईल काय या बाबत चाचपणी सुरु आहे, सरकार जर काहीच करणार नसेल तर हाच उपाय उरला आहे. अशी माहिती एका संघटनेच्या प्रतिनिधींनी लोकमतला दिली.प्रदूषणाचा फटका खाडीतील मच्छीमारीलाया तेलाच्या तवंगामुळे प्लवंगरूपात समुद्रात तरंगत असलेली अंडी (मत्स्यबीज) नष्ट होणार असून खाडीवर अवलंबून असलेला पारंपरिक मच्छिमार उध्वस्त होणार आहे. - प्रो. भूषण भोईर.