शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

ग्रामसेवकांचा आता असहकार; आजपासून कामावर रुजू होणार, परंतु नॉन कोआॅपरेशनचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:58 IST

पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी अशोक पाटील हे २० आॅगस्ट रोजी रुजू होण्या पूर्वीच लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवून जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ह्यांनी २१ आॅगस्टपासून कामबंदला सुरुवात केली होती.जिल्ह्यातील एकूण ४७३ ग्रामपंचायतीमध्ये १० ग्रामविकास अधिकारी आणि ५२ ग्रामसेवकांची पदे रिक्त असून अनेक अधिकाºयावर २-२ ग्रामपंचायतींचा भार आहे. आधीच ग्रामपंचायती मधील घरकुले, शौचालय उभारणी ही कामे रखडली असून तसेच १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत निधी खर्च केला जात नसल्याने अनेक विकास कामे खोळंबण्याची शक्यता आहे.पालघरच्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच अशोक पाटील ह्यांच्या वर अनेक आक्षेप नोंदविले होते.... तर अशोक पाटलांवर कारवाई करण्यास मी सक्षमतलासरी, डहाणू सह अनेक तालुक्यातील ग्रामसेवकांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला नव्हता. काहींनी दोन चार दिवसानंतर हळूहळू कामावर येणे सुरू केले असून अनेकांची रुजू व्हायची इच्छा आहे. मात्र महाराष्ट्र युनियन कडून कारवाई होण्याची भीती असल्याने ते रु जू झाले नाहीत.ग्रामसेवकानी २१ आॅगस्ट पासून सुरू केलेल्या कामबंदची गंभीर दखल सीईओ मिलिंद बोरीकर यांनी घेवून त्यांना चर्चेला बोलाविले होते. अशोक पाटील यांनी कुठलेही नियमबाह्य काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास मी स्वत: सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.अशोक पाटीलांवरील आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगून अनेक विकास कामे, दाखले, रखडू नये म्हणून तात्काळ रु जू होण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाºयांनीही रजेवरील ग्रामविकास अधिकाºयांना नोटीसा बजावल्याचे गटविकास अधिकारी घोरपडेंनी सांगितले.काम बंद आंदोलन पुकारून बेकायदेशीररित्या सामूहिक रजेवर गेलेल्या सर्व ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक याच्या पगारातून रजेवर असलेल्या सर्व दिवसांचे पैसे कापून घेणार.-मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरमुख्यकार्यकारी अधिकाºया सोबत झालेल्या चर्चे अंती आम्ही हे आंदोलन मागे घेत असून जनतेला वेठीस धरणार नाहीत. मात्र प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार नाहीत.- सुचित घरत, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना, पालघरआठ तालुक्यातील आकडेवारीतालुके ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकवसई ३१ १० १८पालघर १३३ ३३ ९७डहाणू ८५ ४२ ४१तलासरी २१ १७ ०४वाडा ८४ ०६ ६८विक्र मगड ४२ ०५ २५जव्हार ५० ०४ ३०मोखाडा २७ ०३ १८

टॅग्स :Vasai Virarवसई विरार