शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

ग्रामसेवकांचा आता असहकार; आजपासून कामावर रुजू होणार, परंतु नॉन कोआॅपरेशनचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:58 IST

पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी अशोक पाटील हे २० आॅगस्ट रोजी रुजू होण्या पूर्वीच लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवून जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ह्यांनी २१ आॅगस्टपासून कामबंदला सुरुवात केली होती.जिल्ह्यातील एकूण ४७३ ग्रामपंचायतीमध्ये १० ग्रामविकास अधिकारी आणि ५२ ग्रामसेवकांची पदे रिक्त असून अनेक अधिकाºयावर २-२ ग्रामपंचायतींचा भार आहे. आधीच ग्रामपंचायती मधील घरकुले, शौचालय उभारणी ही कामे रखडली असून तसेच १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत निधी खर्च केला जात नसल्याने अनेक विकास कामे खोळंबण्याची शक्यता आहे.पालघरच्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच अशोक पाटील ह्यांच्या वर अनेक आक्षेप नोंदविले होते.... तर अशोक पाटलांवर कारवाई करण्यास मी सक्षमतलासरी, डहाणू सह अनेक तालुक्यातील ग्रामसेवकांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला नव्हता. काहींनी दोन चार दिवसानंतर हळूहळू कामावर येणे सुरू केले असून अनेकांची रुजू व्हायची इच्छा आहे. मात्र महाराष्ट्र युनियन कडून कारवाई होण्याची भीती असल्याने ते रु जू झाले नाहीत.ग्रामसेवकानी २१ आॅगस्ट पासून सुरू केलेल्या कामबंदची गंभीर दखल सीईओ मिलिंद बोरीकर यांनी घेवून त्यांना चर्चेला बोलाविले होते. अशोक पाटील यांनी कुठलेही नियमबाह्य काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास मी स्वत: सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.अशोक पाटीलांवरील आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगून अनेक विकास कामे, दाखले, रखडू नये म्हणून तात्काळ रु जू होण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाºयांनीही रजेवरील ग्रामविकास अधिकाºयांना नोटीसा बजावल्याचे गटविकास अधिकारी घोरपडेंनी सांगितले.काम बंद आंदोलन पुकारून बेकायदेशीररित्या सामूहिक रजेवर गेलेल्या सर्व ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक याच्या पगारातून रजेवर असलेल्या सर्व दिवसांचे पैसे कापून घेणार.-मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरमुख्यकार्यकारी अधिकाºया सोबत झालेल्या चर्चे अंती आम्ही हे आंदोलन मागे घेत असून जनतेला वेठीस धरणार नाहीत. मात्र प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार नाहीत.- सुचित घरत, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना, पालघरआठ तालुक्यातील आकडेवारीतालुके ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकवसई ३१ १० १८पालघर १३३ ३३ ९७डहाणू ८५ ४२ ४१तलासरी २१ १७ ०४वाडा ८४ ०६ ६८विक्र मगड ४२ ०५ २५जव्हार ५० ०४ ३०मोखाडा २७ ०३ १८

टॅग्स :Vasai Virarवसई विरार