शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:52 IST

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही.

नालासोपारा - लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्या असल्या तरी वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे परिवहन सेवा बंद असल्याने मागील पाच महिन्यांपासून दोन हजार कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. सेवा बंद असल्याने आर्थिक परिस्थितीचे कारण देत ठेकेदार कर्मचाºयांना पगार देत नाही आणि कर्मचाºयांना दुसरीकडे नोकरीही मिळत नाही. त्यामुळे घर चालवायचे कसे, असा प्रश्न या कर्मचाºयांना पडला आहे. एस.टी. महामंडळ कर्मचाºयांना अर्धा पगार देत आहे, मग परिवहन ठेकेदार का देत नाही, असा सवाल या कर्मचाºयांनी केला आहे. लॉकडाऊनमध्ये एस.टी. काही प्रमाणात तर मुंबईतही बेस्ट सुरू होती. आम्हीही काम करायला तयार आहोत, मात्र ठेकेदारच बससेवा सुरू करत नसल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे. तर आयुक्तांशी पगाराबाबत बोलणी सुरू आहे, असे कारणदेत ठेकेदाराने ऐनवेळी हात वरकेल्याने कर्मचाºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.बस नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल1परिवहन सेवेतील कर्मचाºयांवर पगाराविना आर्थिक संकट ओढवले असताना बस नसल्याने शहरातील सामान्य नागरिकांचेही हाल होत आहेत. वसई-विरार शहरांचे जनजीवन आता पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. दुकाने, बाजारपेठा तसेच वसई पूर्वेला असलेल्या औद्योगिक कंपन्याही सुरू झाल्या आहेत.2मात्र, या ठिकाणी जाण्याची सोय कामगारांना उपलब्ध नाही. त्यामुळे शेकडो कर्मचारी दररोज ८ ते १० किलोमीटर पायपीट करत कंपनीत पोहोचतात. त्यामुळे शहरांतर्गत बस सुरू करावी, अशी मागणी विविध संस्था आणि संघटनांनी केली आहे.अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या ३५ ते ४० कर्मचाºयांचा पगार देण्यात आला आहे व जे कामावर नाहीत, त्यांना पगार देण्यात आलेला नाही. मनपा परिवहन सेवा सुरू करण्यास सांगते आहे. पण, पैशांचे काहीही बोलत नाही किंवा हमी देत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या आधारे ५० टक्के प्रवासी कमी झाल्यावर डिझेलचा खर्चही सुटणार नाही. पगाराबाबत आयुक्तांकडे आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. लवकरच काही निर्णय येईल.- मनोहर सकपाळ, संचालक, मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट प्रा.लि.ठेकेदाराचा कर्मचाºयांच्या पगाराबाबत महानगरपालिकेशी कोणताही संबंध नाही. ठेकेदार कर्मचाºयांच्या पगारासाठी जबाबदार असतो. कंत्राटदाराने गरिबांना पैसे द्यावे. मागेही या कामगारांनी पगार मिळाला नाही म्हणून संपाचे हत्यार उपसले होते. त्या वेळी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कंत्राटदाराला स्पष्ट ताकीद दिली होती की, कर्मचाºयांचे पगार तुम्ही द्यायचे. ते जर आमच्या कार्यालयात आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल.-विश्वनाथ तळेकर, प्रभारी सहायक आयुक्त,वसई-विरार माहापालिकाआम्हाला पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. घर चालविणे अवघड झाले आहे. काम नाही आणि खर्च होत आहे. बसेसही सुरू होत नाहीत. दुसरे कामदेखील करू शकत नाही. किमान घर चालविण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत दिली पाहिजे.- सोमनाथ गायकवाड, बसचालक,परिवहन सेवा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस