शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:52 IST

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही.

नालासोपारा - लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्या असल्या तरी वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे परिवहन सेवा बंद असल्याने मागील पाच महिन्यांपासून दोन हजार कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. सेवा बंद असल्याने आर्थिक परिस्थितीचे कारण देत ठेकेदार कर्मचाºयांना पगार देत नाही आणि कर्मचाºयांना दुसरीकडे नोकरीही मिळत नाही. त्यामुळे घर चालवायचे कसे, असा प्रश्न या कर्मचाºयांना पडला आहे. एस.टी. महामंडळ कर्मचाºयांना अर्धा पगार देत आहे, मग परिवहन ठेकेदार का देत नाही, असा सवाल या कर्मचाºयांनी केला आहे. लॉकडाऊनमध्ये एस.टी. काही प्रमाणात तर मुंबईतही बेस्ट सुरू होती. आम्हीही काम करायला तयार आहोत, मात्र ठेकेदारच बससेवा सुरू करत नसल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे. तर आयुक्तांशी पगाराबाबत बोलणी सुरू आहे, असे कारणदेत ठेकेदाराने ऐनवेळी हात वरकेल्याने कर्मचाºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.बस नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल1परिवहन सेवेतील कर्मचाºयांवर पगाराविना आर्थिक संकट ओढवले असताना बस नसल्याने शहरातील सामान्य नागरिकांचेही हाल होत आहेत. वसई-विरार शहरांचे जनजीवन आता पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. दुकाने, बाजारपेठा तसेच वसई पूर्वेला असलेल्या औद्योगिक कंपन्याही सुरू झाल्या आहेत.2मात्र, या ठिकाणी जाण्याची सोय कामगारांना उपलब्ध नाही. त्यामुळे शेकडो कर्मचारी दररोज ८ ते १० किलोमीटर पायपीट करत कंपनीत पोहोचतात. त्यामुळे शहरांतर्गत बस सुरू करावी, अशी मागणी विविध संस्था आणि संघटनांनी केली आहे.अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या ३५ ते ४० कर्मचाºयांचा पगार देण्यात आला आहे व जे कामावर नाहीत, त्यांना पगार देण्यात आलेला नाही. मनपा परिवहन सेवा सुरू करण्यास सांगते आहे. पण, पैशांचे काहीही बोलत नाही किंवा हमी देत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या आधारे ५० टक्के प्रवासी कमी झाल्यावर डिझेलचा खर्चही सुटणार नाही. पगाराबाबत आयुक्तांकडे आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. लवकरच काही निर्णय येईल.- मनोहर सकपाळ, संचालक, मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट प्रा.लि.ठेकेदाराचा कर्मचाºयांच्या पगाराबाबत महानगरपालिकेशी कोणताही संबंध नाही. ठेकेदार कर्मचाºयांच्या पगारासाठी जबाबदार असतो. कंत्राटदाराने गरिबांना पैसे द्यावे. मागेही या कामगारांनी पगार मिळाला नाही म्हणून संपाचे हत्यार उपसले होते. त्या वेळी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कंत्राटदाराला स्पष्ट ताकीद दिली होती की, कर्मचाºयांचे पगार तुम्ही द्यायचे. ते जर आमच्या कार्यालयात आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल.-विश्वनाथ तळेकर, प्रभारी सहायक आयुक्त,वसई-विरार माहापालिकाआम्हाला पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. घर चालविणे अवघड झाले आहे. काम नाही आणि खर्च होत आहे. बसेसही सुरू होत नाहीत. दुसरे कामदेखील करू शकत नाही. किमान घर चालविण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत दिली पाहिजे.- सोमनाथ गायकवाड, बसचालक,परिवहन सेवा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस