शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

तारापूर एमआयडीसीमध्ये टँकरना ‘नाे एंट्री’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:25 IST

Tarapur News : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून साेडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून साेडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, हे आदेशच धाब्यावर बसवून उद्याेग टँकरद्वारे बेकायदा अतिरिक्त पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसाळ यांनी ५ डिसेंबर ते २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत टँकर वाहतुकीवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी बंदी कालावधीत औद्याेगिक क्षेत्रात टँकरची वाहतूक हाेऊ नये यासाठी दक्षता पथके नेमून पाेलिसांनाही लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील उद्याेगांच्या गैरप्रकारांना चांगलाच चाप बसला आहे. यातून अग्निशमन दलाची वाहने वगळण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत पाण्याच्या टँकरना एमआयडीसीच्या लेखी परवानगीने वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे.तारापूर एमआयडीसीतील काही उद्योगांमधून तसेच बाहेरून आणि परराज्यातून टँकरमधून घातक रासायनिक सांडपाणी तारापूर व परिसरात रात्रीच्या अंधारात आणून त्याची बेकायदा विल्हेवाट लावली जात असल्यामुळे आसपासच्या परिसरातील प्रदूषणात वाढ होऊन त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर हाेत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांसाेबत ११ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती.  त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेश काढून टँकरवर बंदी  घातली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तारापूर एमआयडीसीमध्ये बेकायदा विल्हेवाट लावण्यासाठी अनेक टँकरने पाणी आणि विविध घातक रासायनिक कचरा वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे. 

प्रक्रियेविनाच साेडतात पाणी ४० टक्के पाणीकपातीनंतर उत्पादन प्रक्रियेसाठी टँकरद्वारे अतिरिक्त पाणी बेकायदा घेत असल्याने २५ एमएलडी क्षमतेच्या सीईटीपीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी येऊ लागल्याने अतिरिक्त सांडपाणी प्रक्रियेविना नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने त्याचा गंभीर दुष्परिणाम मासेमारी, शेती व आरोग्यावर होऊ लागल्यामुळे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादाकडे दावा दाखल करून लढ़ा सुरू केला आहे. या लवादाच्या दिल्ली खंडपीठाने तारापूर व परिसरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आदेश दिले होते.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार