शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पुढच्या वर्षी डोल्हारा होणार टॅँकरमुक्त; ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:22 IST

पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांनी लोकमतला दिली आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांनी लोकमतला दिली आहे.२०१२ या वर्षी भिषण पाणी टंचाईमुळे डोल्हारा येथील पार्वती जाधव या आदिवासी महिलेला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने १ कोटी ५६ लाख रु पये अंदाज पत्रकीय रक्कमेच्या पाझर तलावाच्या कामाला मंजुरी दिली होती.त्वरीत स्थानिक आमदार व खासदारांच्या हस्ते उद्घाटन करून २०१२ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. परंतु कागदपत्रांच्या पुर्ततेत व वारंवार कामात झालेला फेरबदल यामुळे या साठवण तलावाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षे रखडले होते.परंतु या कामाच्या सुधारित संकल्प चित्रानुुुसार डिजाईन काँक्र ीट हायग्रेट केला जाणार असल्याने यासाठी ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या तलावाची व्याप्ती १३ हेक्टर च्या आसपास पाणी साठा होणार असूूून मे २०१८ अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यामुुुळे पुढच्या वर्षी डोल्हारा गाव टँकर मुक्त व पाणी टंचाई मुक्त होईल अशी अशा आहे.गाव उंचावर असल्याने तीव्र टंचाईडोल्हारा गावची लोकसंख्या १४६० एवढी असून हे गाव उंच टेकडीवर वसलेले आहे. तसेच विहीरीचे अंतरही खुप दुरवर आह.े उन्हाळ्यात विहीर तळ गाठत असल्याने टँकरच्या पाण्याने डोल्हारा वासियांना तहान भागवावी लागते. येथील पाण्याचा प्रश्नही अतिशय गंभीर आहे. यामुळे २०१२ मध्ये पार्वती जाधव या महिलेला घोटभर पाण्यासाठी आटापिटा करत असताना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी