शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यात आता नवी राजकीय समीकरणे आली उदयास; भाजप बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:53 IST

सामाजिक क्षेत्रातील जिजाऊची राजकारणात एंण्ट्री

रवींद्र साळवे मोखाडा : पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन प्रचारादरम्यान सेना-राष्ट्रवादीचे नेते मंडळी करत होते. या आवाहनाला जणू लोकांनी प्रतिसाद दिला आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. यामुळे जिल्हा परिषदेतील नंबर १ चा पक्ष नंबर ३ वर गेला. या वेळी जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यानुसार सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊची राजकारणात एंट्री झाली.

राष्ट्रवादीची सरशी झाली. यातून भाजपचा बालेकिल्ला एकदम ढासळला. यामुळे भाजप जिल्ह्यात बॅकफूटवर गेला आहेच, त्याचबरोबर जिल्ह्यात सध्या लोकसभा, विधानसभा आणि जि.प.तूनही भाजप हद्दपार झाल्याचे चित्र आहे. विक्रमगड नगरपंचायतीमध्ये जिजाऊने काँग्रेससोबत निवडणूक लढवून नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. या वेळी एका सदस्याची गरज असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या वेळीच खरे तर भविष्यातील सांबरे-भुसारा एकत्रीकरणाची नांदी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत झाली. जिजाऊ आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित येऊन भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर २ चा पक्ष ठरला आहे.

विक्रमगड विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या वेळी लोकसभेला महाआघाडीने भाजपपेक्षा जास्त मते मिळवली होती, तर विधानसभेत २१ हजारांच्या मताधिक्क्याने भाजपला हरवत सुनील भुसारा आमदार झाले. तेव्हाच खरे तर भाजपची पीछेहाट होत होती. भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला शह देण्यासाठी नीलेश सांबरे यांची जिजाऊ आणि आमदार सुनील भुसारा यांची चाणक्यनीती कामी आली. जर जिजाऊ स्वबळावर आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली असती तर मात्र चित्र वेगळे असते. यामुळे भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-जिजाऊ एकत्र आली आणि ही खेळी यशस्वीही ठरली. या सगळ्यात भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा विक्रमगड तालुका लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत ढासळला. यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने घडली, ती म्हणजे पालघर पर्यायाने कोकणात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था आता राजकारणात आली आहे.संघटनेचा प्रभावजिजाऊ संघटनेची आता नव्या दमात राजकारणात एंट्री झालेली आहे. जिल्ह्यातील येणाºया सर्व निवडणुकांत संघटनेचा प्रभाव राहील, अशी स्थिती असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता जिजाऊची दखल घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा