शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता नवी राजकीय समीकरणे आली उदयास; भाजप बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:53 IST

सामाजिक क्षेत्रातील जिजाऊची राजकारणात एंण्ट्री

रवींद्र साळवे मोखाडा : पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन प्रचारादरम्यान सेना-राष्ट्रवादीचे नेते मंडळी करत होते. या आवाहनाला जणू लोकांनी प्रतिसाद दिला आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. यामुळे जिल्हा परिषदेतील नंबर १ चा पक्ष नंबर ३ वर गेला. या वेळी जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यानुसार सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊची राजकारणात एंट्री झाली.

राष्ट्रवादीची सरशी झाली. यातून भाजपचा बालेकिल्ला एकदम ढासळला. यामुळे भाजप जिल्ह्यात बॅकफूटवर गेला आहेच, त्याचबरोबर जिल्ह्यात सध्या लोकसभा, विधानसभा आणि जि.प.तूनही भाजप हद्दपार झाल्याचे चित्र आहे. विक्रमगड नगरपंचायतीमध्ये जिजाऊने काँग्रेससोबत निवडणूक लढवून नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. या वेळी एका सदस्याची गरज असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या वेळीच खरे तर भविष्यातील सांबरे-भुसारा एकत्रीकरणाची नांदी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत झाली. जिजाऊ आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित येऊन भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर २ चा पक्ष ठरला आहे.

विक्रमगड विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या वेळी लोकसभेला महाआघाडीने भाजपपेक्षा जास्त मते मिळवली होती, तर विधानसभेत २१ हजारांच्या मताधिक्क्याने भाजपला हरवत सुनील भुसारा आमदार झाले. तेव्हाच खरे तर भाजपची पीछेहाट होत होती. भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला शह देण्यासाठी नीलेश सांबरे यांची जिजाऊ आणि आमदार सुनील भुसारा यांची चाणक्यनीती कामी आली. जर जिजाऊ स्वबळावर आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली असती तर मात्र चित्र वेगळे असते. यामुळे भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-जिजाऊ एकत्र आली आणि ही खेळी यशस्वीही ठरली. या सगळ्यात भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा विक्रमगड तालुका लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत ढासळला. यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने घडली, ती म्हणजे पालघर पर्यायाने कोकणात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था आता राजकारणात आली आहे.संघटनेचा प्रभावजिजाऊ संघटनेची आता नव्या दमात राजकारणात एंट्री झालेली आहे. जिल्ह्यातील येणाºया सर्व निवडणुकांत संघटनेचा प्रभाव राहील, अशी स्थिती असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता जिजाऊची दखल घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा