शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 6:01 PM

पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

हितेंन नाईक -पालघर- पालघरच्या वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला अखेर यश आले. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एन डी आरएफच्या टीमचे काम सुलभ झाले आणि १६ तासापासून नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षभरापासून सुरू असून ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरने मोठा प्रोजेक्ट् बहाडोली गावात उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी पिलर उभारण्याचे काम, मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असताना ही धोकादायक रित्या सुरूच होते. कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जीएम कंपनीच्या व्यवस्थापकांनी १० कामगारांना नदीच्या धोकादायक प्रवाहात लोटून दिले होते.

जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून अनेक लोक अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून त्यातून लाखो क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. अशा वेळी कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची जोखीम ह्या १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली होती.

बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे एन डी आरएफकडे असलेल्या साधन सामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमाराच्या बोटीची मदत ही धोकादायक परिस्थिती मुळे उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनिल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी ह्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ह्यावेळी स्थानिक पोलिसांचे सहकार्य ही महत्वपूर्ण ठरले. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल