शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजलच्या नळ पाणी योजना अपूर्णच; किरकोळ कामांचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:54 IST

या योजने अंतर्गत विहिरीची कामे झाली असली तरी त्यातील पाणी अजून गावकऱ्यांना मिळालेले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत.

विक्रमगड : परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई होऊ नये म्हणून सहा वर्षांपूर्वी येथे राष्टÑीय पेय जल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली उपराळे या गावांमध्ये या योजनेची अम्मल बजावणी झाली असली तरी किरकोळ कामे अपुर्ण असल्याने योजना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही.या योजने अंतर्गत विहिरीची कामे झाली असली तरी त्यातील पाणी अजून गावकऱ्यांना मिळालेले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, त्याबाबत ना जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाकडून उत्तर मिळत ना ग्रामपंचायती कडून अशी स्थिती आहे. या योजनांची कामे ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या असून यावर मोठ्याप्रमाणात खर्च झालेल्या असतानाही त्या अपुर्णच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.या बाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता ग्रामसेवक संरपच व त्या समितीची बैठक नुकतीच झाली असून शिल्लक निधीतून उर्वरित कामे करण्याचे ठरले आहे. तसे न झाल्यास आवश्यक निधी पाणीपुरवठा विभागाच्या यांच्या खात्यात जमा करा म्हणजे या योजना पाणीपुरवठा विभाग पुर्ण करेल असे ठरले आहे. मात्र हे कधी होणार या बाबत ठोस माहिती मिळाली नाही. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्ची पडल्यानंतरही या योजना पडून राहत असतील तर हे गंभीर असल्याचे मा. क.प. चे किरण गहला यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी