शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

नागनाथ येथे शेतकऱ्यांना हवा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 23:55 IST

उद्योगांनाही मिळेल पाणी : २५ गावांसह हजारो हेक्टर जागा येईल ओलिताखाली

वाडा : तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी अशा पाच नद्या वाडा तालुक्याला लाभल्या आहेत. मात्र पाण्याबाबत योग्य नियोजन नसल्याने या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. नियोजनाअभावी हा तालुका आजही तहानलेलाच आहे. खानिवली परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, सिंचनासाठी पाणी तसेच उद्योजकांचा पाण्याच्या प्रश्न सोडवायचा असेल, तर वैतरणा नदीवर नागनाथ येथे बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वैतरणा नदी किनारी आंबिस्ते गावाच्या हद्दीत नागनाथ हे देवस्थान आहे. या देवस्थानच्या जवळून वैतरणा नदी गेली असून हे देवस्थान उंच टेकडीवर आहे. नदीचा भाग खोल असून येथे मे-जून या अखेरच्या क्षणीही मुबलक पाणी साठा असतो. येथे एक मोठा बंधारा बांधल्यास त्याचा फायदा खानिवली परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी तसेच उद्योजकांना होऊ शकतो. या बंधाºयामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊन हा परिसर हिरवागार होऊ शकतो. सर्व खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन योजना राबवून हा प्रश्न मार्गी लावता येईल. त्यामुळे येथे बंधारा बांधण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.नागनाथ येथे बंधारा झाल्यास या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. येथील शेती हिरवीगार होऊन शेतकºयांना दुबार पिके घेता येतील. त्याचबरोबर शेतकरी भाजीपाला, फुलशेती, फळशेतीही करू शकतील. त्याचबरोबर आजूबाजूच्या वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. पाण्याच्या पातळीत वाढ होईल. कुपनलिका, विहिरीचे पाणीही वाढण्यास मदत होईल.सुरेश पवार यांचे २००३ पासून प्रयत्न सुरूराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व खानिवली गावचे माजी सरपंच सुरेश पवार हे नागनाथ येथे बंधारा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. २००३ पासून ते शासन दरबारी पत्रव्यवहार करीत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष स्व.बबनराव पाटील व कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपाध्यक्ष गोटीराम पवार यांनी नागनाथ येथे शासकीय दौरा केला होता. यावेळी त्यांनीही या बंधाºयामुळे शेती हिरवीगार होईल, असा आशावाद व्यक्त केला होता.चांगल्या बंधाºयांची गरज : तालुक्यातील शेतकºयांचा विकास करायचा असेल तर येथील सर्व नद्यांवर १० किलोमीटर अंतरावर गळती न होणारे चांगले बंधारे बांधले पाहिजेत. या बंधाºयांच्या पाण्यावर परिसरातील सर्व खेड्यांमध्ये उपसा जलसिंचन योजना राबवून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली पाहिजे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.लाभक्षेत्रात येणारीगावे व जमिनीचे क्षेत्रआंबिस्ते खुर्द २२९ हेक्टरआंबिस्ते बु. ५८९ हेक्टरखानिवली १८९ हेक्टरआब्जे ३६६ हेक्टरवैतरणा नगर २७२ हेक्टरनिचोळे २७३ हेक्टरभावेघर १८३ हेक्टरया बंधाºयाच्या कामाच्या सर्वेक्षणाचे काम याच वर्षी करण्यात आले आहे. नाशिक जलसंधारण विभागाकडून पाणी साठ्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले की हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविणार आहोत.- ए.बी.फुंदे, जलसंधारण विभाग, ठाणेबिलोशी, वसुरी, खरीवली, पालसई, खुपरी, बिलावली, देवघर, गौरापूर, बोरांडा, घोडमाळ, पिंपळास, चनेमान, खरीवली, टकली, मांडा, भोपीवली, आपटी, देवळी या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल.नागनाथ येथे श्री कालभैरव व श्री शंकराचे देवस्थान आहे. या देवस्थानची सुमारे ३५० एकर जमीन आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तर दररोज शेकडो भक्तगण येथे येत असतात.कमी खर्चात जास्त गावांना फायदानागनाथ येथे बंधारा बांधून हे पाणी वसुरी येथील नाल्यात सोडल्यास सुमारे दहा ते पंधरा कि.मी. अंतरावर या पाण्याचा फायदा शेतकºयांना होईल. त्यासाठी कालवा काढण्याची गरज पडणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी संयुक्त पाणी योजना राबवल्यास त्याचा लाभ पंचवीसहून अधिक गावांना होऊ शकतो. हेच पाणी उद्योजकांनाही देणे शक्य असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार