शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या वसईकरांना मनपाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:47 IST

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची ...

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरणा केली नाही, त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी अदा न केलेल्या २०० हून अधिक नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही पालिका हद्दीत सुरूच आहे, तर बहुतेक नागरिकांचे उद्योगधंदे, व्यवसाय आणि नोकऱ्याही सुटल्या आहेत. अशा वातावरणात विविध प्रकारच्या कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रातील नळजोडणीधारकांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागील थकबाकीचा भरणा केलेला नाही, अशा नळजोडणीधारकांकडून मागील पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्याच्या अनुषंगाने नळजोडणी खंडित करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. या तोडू कारवाईअंतर्गत खंडित करण्यात येणारी नळजोडणी पाणीपट्टीची थकीत रक्कम भरणा केल्यानंतर पुन्हा वितरण वाहिनीवर जोडण्यासाठी रु. २५००/- प्रति जोडणी अशी आकारणी करण्यात येईल, असा फतवादेखील महापालिका प्रशासनाने काढला होता. या नोटिसीमध्ये थकीत पाणीपट्टीधारकांनी पाणीपट्टी कराची थकबाकी रक्कम आपल्या नजीकच्या महानगरपालिका कार्यालयात भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत पाणीपट्टी थकबाकीधारकांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात येत आहेत. या कारवाईत आतापर्यंत २०० हून अधिक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, असे पाणी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.नागरिक गेले १० महिने घरीच आहेत, लोकल ट्रेन सुरू झाल्या नाहीत, नागरिकांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही, अशा परिस्थितीत नळ जोडण्या खंडित केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोरोनाकाळात कारवाई अयोग्यवसई-विरार महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवारीची चर्चा रंगत आहे, अशा वातावरणात नळ जोडण्या खंडित करण्याचा विषय तापणार असून विविध पक्ष महापालिकेच्या या धडक कारवाईबाबत आक्षेप घेत, कोरोनाकाळात अशा प्रकारची कारवाई योग्य नसल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी