शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या वसईकरांना मनपाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:47 IST

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची ...

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरणा केली नाही, त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी अदा न केलेल्या २०० हून अधिक नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही पालिका हद्दीत सुरूच आहे, तर बहुतेक नागरिकांचे उद्योगधंदे, व्यवसाय आणि नोकऱ्याही सुटल्या आहेत. अशा वातावरणात विविध प्रकारच्या कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रातील नळजोडणीधारकांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागील थकबाकीचा भरणा केलेला नाही, अशा नळजोडणीधारकांकडून मागील पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्याच्या अनुषंगाने नळजोडणी खंडित करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. या तोडू कारवाईअंतर्गत खंडित करण्यात येणारी नळजोडणी पाणीपट्टीची थकीत रक्कम भरणा केल्यानंतर पुन्हा वितरण वाहिनीवर जोडण्यासाठी रु. २५००/- प्रति जोडणी अशी आकारणी करण्यात येईल, असा फतवादेखील महापालिका प्रशासनाने काढला होता. या नोटिसीमध्ये थकीत पाणीपट्टीधारकांनी पाणीपट्टी कराची थकबाकी रक्कम आपल्या नजीकच्या महानगरपालिका कार्यालयात भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत पाणीपट्टी थकबाकीधारकांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात येत आहेत. या कारवाईत आतापर्यंत २०० हून अधिक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, असे पाणी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.नागरिक गेले १० महिने घरीच आहेत, लोकल ट्रेन सुरू झाल्या नाहीत, नागरिकांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही, अशा परिस्थितीत नळ जोडण्या खंडित केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोरोनाकाळात कारवाई अयोग्यवसई-विरार महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवारीची चर्चा रंगत आहे, अशा वातावरणात नळ जोडण्या खंडित करण्याचा विषय तापणार असून विविध पक्ष महापालिकेच्या या धडक कारवाईबाबत आक्षेप घेत, कोरोनाकाळात अशा प्रकारची कारवाई योग्य नसल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी