शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

त्यांची सुरक्षा मुंबई मनपाने पाहावी- वसई मनपा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:32 IST

तानसा - वैतरणा धरणाचे पाणी नागरिकांच्या घरात

वसई : मुंबई महापालिकेची तानसा, वैतरणा नदीवर असणारी धरणे यंदा भरली असून त्याचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये आले आहे. या भागातील गावे आणि येथील काही घरे वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत असून तानसा, वैतरणा या दोन्ही धरणांच्या पाण्यामुळे येथील गावातील घरांमध्ये पाणी साचले होते. यामुळे येथील नागरिकांच्या वस्तीला धोका असून भविष्यात हा धोका उद्भवू नये, यासाठी येथे मजबूत बंधारा बांधावा अशी मागणी आम्ही मुंबई महानगरपालिकेकडे करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.वसईत सलग दुसऱ्या वर्षी आणि यंदा तीन वेळा आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निरी तसेच आयआयटी, मुंबई या तांत्रिक संस्थाच्या तज्ज्ञांनी पुन्हा एकदा वसई-विरारचा दौरा केला. धरणाच्या पाण्यामुळे घरात आलेले पाणी देखील निरी आणि आयआयटीच्या टीमला यावेळी प्रत्यक्ष पाहता आले. या टीमने वसई विरार शहरातील सर्व सखल भागांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यानुसार आता या संस्थांमार्फत शहरातील सर्वेक्षण पर्जन्यमान आणि सद्य स्थितीतील ड्रेन मॅप तयार करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे निरीने सांगितले आहे.दरम्यान, गेल्यावर्षी वसई - विरारमध्ये अतिवृष्टी झाली होती. तेव्हासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी महापालिकेने सत्यशोधन समिती देखील स्थापन केली. यात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या तांत्रिक शासनमान्य संस्थांचा समावेश होता.एकूणच या संपूर्ण अभ्यास समितीच्या कामासाठी पालिकेने या संस्थेला १२ कोटी रुपये शुल्क म्हणून दिले आहेत. मात्र, यंदा देखील अशाच पूरस्थितीला वसईकरांना तोंड द्यावे लागले. एकदाच नाही तर तीन वेळा ही परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेने पुन्हा या संस्थांना नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी भर पावसात पाचारण केले.त्यानुसार निरी व आयआयटी, मुंबई या दोन्ही संस्थांचे अधिकारी दोनच दिवसांपूर्वी पुन्हा दुसºयादा वसईत दाखल झाले होते. यावेळी महापालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.यंदा साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर - पालिकेचा दावापावसाळ्यापूर्वी आयआयटी आणि नीरी यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे काम करण्यात आले होते. त्यामुळे या साचलेल्या पाण्याचा निचरा गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर झाला, असा दावा वसई - विरार महापालिकेने केला आहे. याप्रसंगी पालिका आयुक्त बळीराम पवार म्हणाले की, आयआयटी आणि निरी यांची टीम वसई विरार मध्ये येऊन गेली, त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना वसई-विरार हद्दीतील जेवढे सखल व धोकादायक भाग आहेत, ते सर्व निदर्शनास आणून दिले.पावसातच घेतला निरीने आढावावसई विरार मध्ये शनिवारी, रविवारी व सोमवारी मुसळधार पाऊस सुरू होता त्यातच दोन दिवसांपूर्वी या पावसाच्या वेळीच विविध भागात भागात आणि साचलेल्या पाण्यात निरी व आयआयटी च्या अधिकारी वर्गानी सर्वेक्षण केले.पाऊस सुरू असल्याने निरीला ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहता आली. त्यानुसार पिम्पंग स्टेशन, होल्डिंग पॉइंट्स या सर्वांचा अहवाल निरी आता देणार आहे. तसेच, भविष्यात अन्य उपाय व दक्षता म्हणून करावयाची कामे यांचा देखील अहवाल निरी आयआयटी पालिकेला सादर करणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका