शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

मुंबई उच्च न्यायालयाची वादग्रस्त जाहिरात ठेक्याला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:18 IST

मनपाला दणका : प्रकरणाला वेगळे वळण

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिकेने दिलेल्या वादग्रस्त जाहिरात फलकांचा कर वसूल करणाऱ्या खाजगी जाहिरात कंपनीच्या ठेका प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. यापूर्वी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्र्यांनी ‘जैसे थे’ आदेश दिला होता तसेच आता मुंबई उच्च न्यायालयानेही जाहिरात निविदेच्या ठेक्याला स्थगिती आदेश दिल्याची माहिती वसई-विरार जाहिरात असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी सुभाष गोंधळे यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई-विरार महापालिकेने मुंबईस्थित मे. वेगास नामक जाहिरात कंपनीला मागील वर्षी हा ठेका दिला होता. सुरुवातीला महापालिकेतील विरोधी गटातील शिवसेना व भाजप नगरसेवकानी पालिकेचे उत्पन्न अधिक असताना व मागील दोन वर्षांपासून जाहिरात कर गोळा न करता कुठलेही सर्वेक्षण न करता तो हेतुपुरस्सर बुडवून कागदावर कमी दाखवून हा ठेका अत्यंत कवडीमोल दराने दिल्याच्या कारणावरून या वादग्रस्त प्रकरणाला मंत्रालयात आव्हान दिले होते. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी सुनावणी घेतली होती आणि या वादग्रस्त जाहिरात ठेक्याला पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ आदेश दिला होता.आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील या जाहिरात ठेकाप्रकरणी वसई-विरार महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून आता पुन्हा या ‘जैसे थे’ प्रकारामुळे पालिका अजूनही वसई विरारमधील कुठल्याही जाहिरात आस्थापनाकडून जाहिरात कर घेत नसल्याने पालिकेचेच आजवर कोट्यवधी रुपयांचे नुकसान मागील दोन ते तीन वर्षांपासून असेच सुरू आहे. वसई-विरार शहरातील हजारो बेकायदा फलकांमुळे शहरांचे विद्रुपीकरण सातत्याने सुरूच आहे. त्यातही वसई-विरार महापालिकेचे जाहिरात धोरण पालिकेला १० वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही मंजूर होत नाही. त्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून जाहिरात फलकांच्या करापोटी एकही रु पयांचे उत्पन्न पालिकेला मिळालेले नाही. अशा जाहिरात फलकांकडून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते. मात्र पालिकेने मागील वर्षी मे.वेगास नामक कंपनीला सहा वर्षासाठी वार्षिक अवघ्या ४० लाख रुपयांचा ठेका मंजूर केला. या प्रकरणी पालिका सभागृहातही पडसाद उमटल्यावर हा ठेका वादाच्या भोवºयात सापडला होता.सर्वेक्षण न करताच ठेका?पालिकेने २०१३ पर्यंतच वसई-विरार शहरातील जाहिरात आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्याआधारे हा ठेका दिला आहे.च्२०१८ मध्ये ठेका देताना पालिकेने पुढील चार वर्षे शहरातील फलकाचे सर्वेक्षण का केले नाही? असा सवाल केला जात आहे.