शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

मुंबई उच्च न्यायालयाची वादग्रस्त जाहिरात ठेक्याला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:18 IST

मनपाला दणका : प्रकरणाला वेगळे वळण

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिकेने दिलेल्या वादग्रस्त जाहिरात फलकांचा कर वसूल करणाऱ्या खाजगी जाहिरात कंपनीच्या ठेका प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. यापूर्वी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्र्यांनी ‘जैसे थे’ आदेश दिला होता तसेच आता मुंबई उच्च न्यायालयानेही जाहिरात निविदेच्या ठेक्याला स्थगिती आदेश दिल्याची माहिती वसई-विरार जाहिरात असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी सुभाष गोंधळे यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई-विरार महापालिकेने मुंबईस्थित मे. वेगास नामक जाहिरात कंपनीला मागील वर्षी हा ठेका दिला होता. सुरुवातीला महापालिकेतील विरोधी गटातील शिवसेना व भाजप नगरसेवकानी पालिकेचे उत्पन्न अधिक असताना व मागील दोन वर्षांपासून जाहिरात कर गोळा न करता कुठलेही सर्वेक्षण न करता तो हेतुपुरस्सर बुडवून कागदावर कमी दाखवून हा ठेका अत्यंत कवडीमोल दराने दिल्याच्या कारणावरून या वादग्रस्त प्रकरणाला मंत्रालयात आव्हान दिले होते. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी सुनावणी घेतली होती आणि या वादग्रस्त जाहिरात ठेक्याला पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ आदेश दिला होता.आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील या जाहिरात ठेकाप्रकरणी वसई-विरार महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून आता पुन्हा या ‘जैसे थे’ प्रकारामुळे पालिका अजूनही वसई विरारमधील कुठल्याही जाहिरात आस्थापनाकडून जाहिरात कर घेत नसल्याने पालिकेचेच आजवर कोट्यवधी रुपयांचे नुकसान मागील दोन ते तीन वर्षांपासून असेच सुरू आहे. वसई-विरार शहरातील हजारो बेकायदा फलकांमुळे शहरांचे विद्रुपीकरण सातत्याने सुरूच आहे. त्यातही वसई-विरार महापालिकेचे जाहिरात धोरण पालिकेला १० वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही मंजूर होत नाही. त्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून जाहिरात फलकांच्या करापोटी एकही रु पयांचे उत्पन्न पालिकेला मिळालेले नाही. अशा जाहिरात फलकांकडून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते. मात्र पालिकेने मागील वर्षी मे.वेगास नामक कंपनीला सहा वर्षासाठी वार्षिक अवघ्या ४० लाख रुपयांचा ठेका मंजूर केला. या प्रकरणी पालिका सभागृहातही पडसाद उमटल्यावर हा ठेका वादाच्या भोवºयात सापडला होता.सर्वेक्षण न करताच ठेका?पालिकेने २०१३ पर्यंतच वसई-विरार शहरातील जाहिरात आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्याआधारे हा ठेका दिला आहे.च्२०१८ मध्ये ठेका देताना पालिकेने पुढील चार वर्षे शहरातील फलकाचे सर्वेक्षण का केले नाही? असा सवाल केला जात आहे.