शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिंदाल बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन

By admin | Updated: October 9, 2015 23:32 IST

पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी

बोईसर : पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शुक्रवारी जिंदाल कंपनीवर मोर्चा काढून किनारपट्टीवरील ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला. त्याप्रसंगी शिवसेनेव्यतिरिक्त सर्वपक्षीय नेते, दोन माजी तर एक विद्यमान आमदार व शाळकरी विद्यार्थी आणि महिला, ग्रामस्थ सहभागी झाले होते.आॅक्टोबर २०१२ मध्ये जिंदाल बंदरासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी तारापूर एमआयडीसीमध्ये घेण्यात आली. त्या जनसुनावणीस पालघर तालुक्यातील सुमारे पंधरा हजार ग्रामस्थ उपस्थित राहून एकमुखाने जिंदालच्या बंदरास विरोध व हरकत नोंदवली. एवढा प्रचंड विरोध होऊनही आवश्यक त्या सर्व परवानग्या जिंदाल बंदरास मिळाल्या आहेत, त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून नांदगाव, आलेवाडी, मुरबे, नवापूर व गुंदवली इ. गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी एमआयडीसीमधील कॅम्लिन नाका ते जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रतीकात्मक तिरडी वाहून मोर्चा काढण्यात आला होता. ती तिरडी वाहण्यासाठी महिलांनी अधिक पुढाकार घेतला होता.मोर्चासमोर विद्यमान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, विधानसभेत मी जिंदाल बंदराला सर्वप्रथम विरोध केलाच आहे. परंतु, उद्या कोर्टापर्यंत जावे लागले तरीही माझी तयारी असल्याचे सांगितले. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शिवसेनेने परवा श्रेय घेण्याकरिता मोर्चा काढल्याचे सांगून कुठल्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नसून स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या बंदराला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी वापकोस कंपनीने किनारपट्टीवरील स्थितीची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणारा अहवाल तयार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी हे आंदोलन कुठल्या पक्षाचे नसून गावकऱ्यांचे आहे. कुणीही मक्तेदारी समजू नये तर जनभावनेच्या विरोधात असलेला प्रकल्प गाडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले.बहुजन विकास आघाडीच्या प्रशांत पाटील यांनी बंदराला हद्दपार करण्यासाठी जिल्हा बंद करण्याचे आवाहन करून डोंगरी व सागरी भागातील नागरिक एकत्र आले तर ते कुणालाही थोपवणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. आरपीआयच्या सचिन लोखंडे यांनी हक्कासाठी आगीशीही लढण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. मनसेचे नांदगावचे सदस्य धीरज गावंड यांनी प्रतीकात्मक तिरडी काढली. वेळ पडली तर खरोखर तिरडी काढण्यास मागेपुढे पाहिले जाणार नसल्याचे सांगितले, तर नांदगावच्या सरपंच विधी मोरे, आलेवाडीच्या सरपंच वैष्णवी ठाकूर, मुरब्याच्या सरपंच प्रज्ञा तरे, नवापूरच्या सरपंच अंजली बारी, कुंभवलीच्या माजी सरपंच तृप्ती संखे, टेंथीचे कुशल राणे, दांडीचे कुंदन दळवी, शाळकरी विद्यार्थिनी श्रद्धा ठाकूर, आलेवाडीचे उपसरपंच सुनील पंडित इ. सर्वांनी बंदराला प्रखर विरोध करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. (वार्ताहर)