शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

जिंदाल बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन

By admin | Updated: October 9, 2015 23:32 IST

पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी

बोईसर : पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शुक्रवारी जिंदाल कंपनीवर मोर्चा काढून किनारपट्टीवरील ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला. त्याप्रसंगी शिवसेनेव्यतिरिक्त सर्वपक्षीय नेते, दोन माजी तर एक विद्यमान आमदार व शाळकरी विद्यार्थी आणि महिला, ग्रामस्थ सहभागी झाले होते.आॅक्टोबर २०१२ मध्ये जिंदाल बंदरासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी तारापूर एमआयडीसीमध्ये घेण्यात आली. त्या जनसुनावणीस पालघर तालुक्यातील सुमारे पंधरा हजार ग्रामस्थ उपस्थित राहून एकमुखाने जिंदालच्या बंदरास विरोध व हरकत नोंदवली. एवढा प्रचंड विरोध होऊनही आवश्यक त्या सर्व परवानग्या जिंदाल बंदरास मिळाल्या आहेत, त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून नांदगाव, आलेवाडी, मुरबे, नवापूर व गुंदवली इ. गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी एमआयडीसीमधील कॅम्लिन नाका ते जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रतीकात्मक तिरडी वाहून मोर्चा काढण्यात आला होता. ती तिरडी वाहण्यासाठी महिलांनी अधिक पुढाकार घेतला होता.मोर्चासमोर विद्यमान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, विधानसभेत मी जिंदाल बंदराला सर्वप्रथम विरोध केलाच आहे. परंतु, उद्या कोर्टापर्यंत जावे लागले तरीही माझी तयारी असल्याचे सांगितले. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शिवसेनेने परवा श्रेय घेण्याकरिता मोर्चा काढल्याचे सांगून कुठल्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नसून स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या बंदराला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी वापकोस कंपनीने किनारपट्टीवरील स्थितीची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणारा अहवाल तयार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी हे आंदोलन कुठल्या पक्षाचे नसून गावकऱ्यांचे आहे. कुणीही मक्तेदारी समजू नये तर जनभावनेच्या विरोधात असलेला प्रकल्प गाडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले.बहुजन विकास आघाडीच्या प्रशांत पाटील यांनी बंदराला हद्दपार करण्यासाठी जिल्हा बंद करण्याचे आवाहन करून डोंगरी व सागरी भागातील नागरिक एकत्र आले तर ते कुणालाही थोपवणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. आरपीआयच्या सचिन लोखंडे यांनी हक्कासाठी आगीशीही लढण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. मनसेचे नांदगावचे सदस्य धीरज गावंड यांनी प्रतीकात्मक तिरडी काढली. वेळ पडली तर खरोखर तिरडी काढण्यास मागेपुढे पाहिले जाणार नसल्याचे सांगितले, तर नांदगावच्या सरपंच विधी मोरे, आलेवाडीच्या सरपंच वैष्णवी ठाकूर, मुरब्याच्या सरपंच प्रज्ञा तरे, नवापूरच्या सरपंच अंजली बारी, कुंभवलीच्या माजी सरपंच तृप्ती संखे, टेंथीचे कुशल राणे, दांडीचे कुंदन दळवी, शाळकरी विद्यार्थिनी श्रद्धा ठाकूर, आलेवाडीचे उपसरपंच सुनील पंडित इ. सर्वांनी बंदराला प्रखर विरोध करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. (वार्ताहर)