शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

जिंदाल बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन

By admin | Updated: October 9, 2015 23:32 IST

पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी

बोईसर : पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शुक्रवारी जिंदाल कंपनीवर मोर्चा काढून किनारपट्टीवरील ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला. त्याप्रसंगी शिवसेनेव्यतिरिक्त सर्वपक्षीय नेते, दोन माजी तर एक विद्यमान आमदार व शाळकरी विद्यार्थी आणि महिला, ग्रामस्थ सहभागी झाले होते.आॅक्टोबर २०१२ मध्ये जिंदाल बंदरासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी तारापूर एमआयडीसीमध्ये घेण्यात आली. त्या जनसुनावणीस पालघर तालुक्यातील सुमारे पंधरा हजार ग्रामस्थ उपस्थित राहून एकमुखाने जिंदालच्या बंदरास विरोध व हरकत नोंदवली. एवढा प्रचंड विरोध होऊनही आवश्यक त्या सर्व परवानग्या जिंदाल बंदरास मिळाल्या आहेत, त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून नांदगाव, आलेवाडी, मुरबे, नवापूर व गुंदवली इ. गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी एमआयडीसीमधील कॅम्लिन नाका ते जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रतीकात्मक तिरडी वाहून मोर्चा काढण्यात आला होता. ती तिरडी वाहण्यासाठी महिलांनी अधिक पुढाकार घेतला होता.मोर्चासमोर विद्यमान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, विधानसभेत मी जिंदाल बंदराला सर्वप्रथम विरोध केलाच आहे. परंतु, उद्या कोर्टापर्यंत जावे लागले तरीही माझी तयारी असल्याचे सांगितले. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शिवसेनेने परवा श्रेय घेण्याकरिता मोर्चा काढल्याचे सांगून कुठल्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नसून स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या बंदराला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी वापकोस कंपनीने किनारपट्टीवरील स्थितीची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणारा अहवाल तयार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी हे आंदोलन कुठल्या पक्षाचे नसून गावकऱ्यांचे आहे. कुणीही मक्तेदारी समजू नये तर जनभावनेच्या विरोधात असलेला प्रकल्प गाडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले.बहुजन विकास आघाडीच्या प्रशांत पाटील यांनी बंदराला हद्दपार करण्यासाठी जिल्हा बंद करण्याचे आवाहन करून डोंगरी व सागरी भागातील नागरिक एकत्र आले तर ते कुणालाही थोपवणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. आरपीआयच्या सचिन लोखंडे यांनी हक्कासाठी आगीशीही लढण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. मनसेचे नांदगावचे सदस्य धीरज गावंड यांनी प्रतीकात्मक तिरडी काढली. वेळ पडली तर खरोखर तिरडी काढण्यास मागेपुढे पाहिले जाणार नसल्याचे सांगितले, तर नांदगावच्या सरपंच विधी मोरे, आलेवाडीच्या सरपंच वैष्णवी ठाकूर, मुरब्याच्या सरपंच प्रज्ञा तरे, नवापूरच्या सरपंच अंजली बारी, कुंभवलीच्या माजी सरपंच तृप्ती संखे, टेंथीचे कुशल राणे, दांडीचे कुंदन दळवी, शाळकरी विद्यार्थिनी श्रद्धा ठाकूर, आलेवाडीचे उपसरपंच सुनील पंडित इ. सर्वांनी बंदराला प्रखर विरोध करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. (वार्ताहर)