शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 10:42 IST

भारतातील हिमाचल प्रदेशामधील "चंद्रभागा शिखर" वसईच्या चार गिर्यारोहकांपैकी दोघांकडूनच सर करण्यात आले आहे. दि.15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास केला.

आशिष राणे

वसई -  वसईतील गिरीकन्या म्हणून सर्वांना सुपरिचित असलेली वसई मांडलई स्थित हर्षांली वर्तक आणि विरार चे  नितीन गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील 6 हजार 18 मीटर उंचीवरील सर्वात कठिण असे चंद्रभागा- 14 हे  शिखर नुकतेच सर करण्यात  यश मिळवले आहे. या एकुणच मोहिमेत वसईतील चार जण सहभागी झाले होते मात्र कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक या दोघांना ही मोहीम अर्धवट सोडून दयावी लागली होती तर देशभरातील विविध भागातून आलेल्या एकूण 12 गिर्यारोहकांचा यात सहभाग होता. तर खास करून कोरोनाच्या संक्रमण काळात तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही अत्यंत कठीण अशी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून दोनच दिवसांपूर्वी आम्ही सर्वं वसईत परतलो असल्याची माहिती वसईतील गिर्यारोहक नितिन गांधी यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे. 

या मोहिमे विषयी अधिक माहिती देतांना गांधी म्हणाले की,हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा- 14 ही खडतर मोहीम फारच अवघड होती,तर मागील तीन वर्षांत चंद्रभागा-14  च्या वाटेला कोणताही गिर्यारोहक त्याची बिकट वाट, अवघड चढण यामुळे फिरकला देखील नव्हता. मात्र इंडियन माऊंटनिंग फाऊंडेशनच्या वतीने तसेच अ‍ॅडव्हेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती आणि आम्ही हर्षाली च्या नेतृत्वाखाली वसईतील  चार जणांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यात महाराष्ट्रातील 5 गुजरात मधील 5 आणि   इंदोर मधील एक व हरियाणातील 1 अशा एकूण 12 गिर्यारोहकांचा समावेश होता.

प्रवास खडतर तरी पहिला प्रयत्न अयशस्वी !दि 15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर  व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास सुरू केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर  कॅम्प 1 ते समिट पर्यंत 4  हजार फुटावर प्रवास करूनही खराब वातावरणामुळे अवघ्या 300  मीटर अंतरावर पोहोचूनही त्यांना आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. तब्बल 17 तासांची मेहनत वाया गेली.मात्र  वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे हवामानाशी मिळते जुळते होऊ शकले नाही आणि शेवटी दोघाना तंबूतच राहावे लागले.

 पुन्हा नव्याने प्रयत्न जिद्द सोडायची नाही !

पुन्हा नव्या जोमाने गटप्रमुख हर्षांली वर्तक यांच्या गटामधील 4  तर दुसऱ्या गटात 6 जणांनी रात्री 10 वाजताच्या दरम्यान चंद्रभागा-14 ही मोहीम सर करायला सुरुवात केली. अत्यंत बोचरी थंडी, गुडघाभर  बर्फ,  सतत सुरू असलेली बर्फवृष्टी अशा कठिण आव्हानांना सामोरे जात 12 तासांची पायपीट करत अखेरीस दि27 जुलै ला  सकाळी 10  वाजता चंद्रभागाच्या शिखरावर पोहोचले. आणि काय तर तेथे पोहोचताच अभिमानाने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. हर्षांली वर्तक हिच्या गटात विरारचे नितीन गांधी,औरंगाबादचा प्रविण शेलके, इंदूरची अ‍ॅनी होते तर वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम मात्र अर्धवटच सोडावी लागलीतरी मात्र कोरोना काळात अशा मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी आणि प्रयत्न करत सर केल्याने  या सर्व वसई तील चारही गिर्यारोहकांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

‘आता स्वप्न कांचनगंगा सर करण्याचे..हर्षांली वर्तकने देश-विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या असून यात माऊंट फ्रेंडशिप पिक, हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, मांऊट मेनथोसा, मांऊट डीकेडी म्हणजे द्रोपदीचा दांडा, माऊंट फ्युजी, माऊंट किल्लीमांजरो, माऊंट इल्बूस या देश-विदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने आजवर सर केल्या असून आता लक्ष केवळ "कांचनगंगा" ही हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची प्रबळ इच्छा तिने लोकमत शी बोलताना व्यक्त केली असून तिचे ते हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात अजिबात शंका नाही