शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 10:42 IST

भारतातील हिमाचल प्रदेशामधील "चंद्रभागा शिखर" वसईच्या चार गिर्यारोहकांपैकी दोघांकडूनच सर करण्यात आले आहे. दि.15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास केला.

आशिष राणे

वसई -  वसईतील गिरीकन्या म्हणून सर्वांना सुपरिचित असलेली वसई मांडलई स्थित हर्षांली वर्तक आणि विरार चे  नितीन गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील 6 हजार 18 मीटर उंचीवरील सर्वात कठिण असे चंद्रभागा- 14 हे  शिखर नुकतेच सर करण्यात  यश मिळवले आहे. या एकुणच मोहिमेत वसईतील चार जण सहभागी झाले होते मात्र कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक या दोघांना ही मोहीम अर्धवट सोडून दयावी लागली होती तर देशभरातील विविध भागातून आलेल्या एकूण 12 गिर्यारोहकांचा यात सहभाग होता. तर खास करून कोरोनाच्या संक्रमण काळात तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही अत्यंत कठीण अशी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून दोनच दिवसांपूर्वी आम्ही सर्वं वसईत परतलो असल्याची माहिती वसईतील गिर्यारोहक नितिन गांधी यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे. 

या मोहिमे विषयी अधिक माहिती देतांना गांधी म्हणाले की,हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा- 14 ही खडतर मोहीम फारच अवघड होती,तर मागील तीन वर्षांत चंद्रभागा-14  च्या वाटेला कोणताही गिर्यारोहक त्याची बिकट वाट, अवघड चढण यामुळे फिरकला देखील नव्हता. मात्र इंडियन माऊंटनिंग फाऊंडेशनच्या वतीने तसेच अ‍ॅडव्हेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती आणि आम्ही हर्षाली च्या नेतृत्वाखाली वसईतील  चार जणांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यात महाराष्ट्रातील 5 गुजरात मधील 5 आणि   इंदोर मधील एक व हरियाणातील 1 अशा एकूण 12 गिर्यारोहकांचा समावेश होता.

प्रवास खडतर तरी पहिला प्रयत्न अयशस्वी !दि 15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर  व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास सुरू केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर  कॅम्प 1 ते समिट पर्यंत 4  हजार फुटावर प्रवास करूनही खराब वातावरणामुळे अवघ्या 300  मीटर अंतरावर पोहोचूनही त्यांना आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. तब्बल 17 तासांची मेहनत वाया गेली.मात्र  वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे हवामानाशी मिळते जुळते होऊ शकले नाही आणि शेवटी दोघाना तंबूतच राहावे लागले.

 पुन्हा नव्याने प्रयत्न जिद्द सोडायची नाही !

पुन्हा नव्या जोमाने गटप्रमुख हर्षांली वर्तक यांच्या गटामधील 4  तर दुसऱ्या गटात 6 जणांनी रात्री 10 वाजताच्या दरम्यान चंद्रभागा-14 ही मोहीम सर करायला सुरुवात केली. अत्यंत बोचरी थंडी, गुडघाभर  बर्फ,  सतत सुरू असलेली बर्फवृष्टी अशा कठिण आव्हानांना सामोरे जात 12 तासांची पायपीट करत अखेरीस दि27 जुलै ला  सकाळी 10  वाजता चंद्रभागाच्या शिखरावर पोहोचले. आणि काय तर तेथे पोहोचताच अभिमानाने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. हर्षांली वर्तक हिच्या गटात विरारचे नितीन गांधी,औरंगाबादचा प्रविण शेलके, इंदूरची अ‍ॅनी होते तर वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम मात्र अर्धवटच सोडावी लागलीतरी मात्र कोरोना काळात अशा मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी आणि प्रयत्न करत सर केल्याने  या सर्व वसई तील चारही गिर्यारोहकांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

‘आता स्वप्न कांचनगंगा सर करण्याचे..हर्षांली वर्तकने देश-विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या असून यात माऊंट फ्रेंडशिप पिक, हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, मांऊट मेनथोसा, मांऊट डीकेडी म्हणजे द्रोपदीचा दांडा, माऊंट फ्युजी, माऊंट किल्लीमांजरो, माऊंट इल्बूस या देश-विदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने आजवर सर केल्या असून आता लक्ष केवळ "कांचनगंगा" ही हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची प्रबळ इच्छा तिने लोकमत शी बोलताना व्यक्त केली असून तिचे ते हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात अजिबात शंका नाही