शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भातपीक नुकसानीची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:21 IST

अधिकाऱ्यांकडे उत्तरेच नाहीत : अधिकाऱ्यांना धरले धारेवर; कमी नुकसान झालेली शेती दाखवली

वाडा : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून पावसामुळे पिके वाया गेली आहेत. वाडा तालुक्यातही परतीच्या पावसाने भातिपकाचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन दिले. दरम्यान, खोत यांनी अधिकाºयांना विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता न आल्याने त्यांना चांगलेच धारेवर धरले.

फलोत्पादन तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाडा तालुक्यातील कुडूस, खुपरी, गातेस बु., सापने तसेच पालघरमधील कुडे हलोली येथील शेतकºयांच्या भातशेतीत जाऊन परतीच्या पावसाने झालेल्या भात पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. गातेस येथे बांधावर थांबून कृषी मंत्री खोत यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली. तालुक्यात १४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जात असून सर्वच पीक वाया गेल्याचे तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी मंत्र्यांना सांगितले. भाताबरोबर गुरांचा चाराही वाया गेल्याचे शेतकºयांनी खोत यांना प्रत्यक्षात दाखवले. यावेळी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये असे आदेश तहसील तसेच कृषी प्रशासनाला दिले. पंचनामे केलेल्या शेतकºयांची यादी ग्रा.पं. कार्यालयात लावा, म्हणजे एखादा शेतकरी राहिला तर त्याला त्या यादीत समाविष्ट करता येईल अशा सूचना देखील खोत यांनी केल्या.पदाधिकारी मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यात व्यस्तकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाड्याचा दौरा करीत भातिपकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांच्या व्यथा मंत्र्यांकडे मांडण्याऐवजी ते त्यांच्यासोबत फोटो काढण्यात व्यस्त असल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.कमी नुकसान झालेली भातशेती : तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही भागातील शेतीत तीन ते चार फूट पाणी असून कापलेले भातपीक पाण्यावर तरंगत आहे. खूप नुकसान झालेली ही भातशेती कृषी विभागाने मंत्री महोदयांना जाणीवपूर्वक दाखवली नसल्याने शेतकºयांनी सदाभाऊ खोत यांच्यासमोरच संताप व्यक्त केला.वाडा कोलम नामांकनासाठी प्रयत्न करणार : वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, या कोलमला नामांकन नाही. त्याला नामांकन मिळावे अशी मागणी काही शेतकºयांनी केली असता यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खोत यांनी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार