शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विद्यार्थिनींचा विनयभंग : अधीक्षकाला बेदम चोप, सहकारी शिक्षकांची बघ्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:50 IST

आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा धामणगाव मधील अधीक्षकानेच दहावीत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन अधिक्षकला अटक करण्यात आली आहे.

- सुरेश काटेतलासरी : आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा धामणगाव मधील अधीक्षकानेच दहावीत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन अधिक्षकला अटक करण्यात आली आहे.धामणगाव शासकीय आश्रम शाळा मधील अधीक्षक सूर्यकांत बागल याने आपला शाळेच्या आवारात डिसेंबर महिन्यात विनयभंग केला असल्याची तक्रार दहावीत शिकत असलेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थीनीने तलासरी पोलीस स्टेशन मध्ये केली.अधीक्षक सूर्यकांत बागल याने डिसेंबर महिन्यात आपल्याला मनास लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचा स्पर्श केला असे तिने शुक्रवारी वर्ग मित्रांना व घरच्यांना सांगितल्यावर मुलीचे नातेवाईकांनी शाळेत येऊन अधीक्षकास बेदम चोप देऊन तलासरी पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मुलीची जबानी घेऊन अधिक्षकास अटक केली, या बाबत शुक्र वारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येऊन आज त्यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले.तर प्रकल्प कार्यालयाचे सहा. प्रकल्प अधिकारी संगीता हुलावळे यांनी आश्रम शाळेला भेट देऊन माहिती घेतली व योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट केले. याबाबत त्यांनी लोकमतला सांगितले महिला अधिक्षकेचे पद रिक्त असून ते तात्काळ भरण्याची कारवाई येत आहे, नवीन इमारतीत निवासस्थान ची सोय नाही.धामणगाव आश्रम शाळेत घडलेल्या या घटनेला प्रकल्प कार्यालय ही तितकेच जबाबदार आहे आश्रम शाळेत दहावी पर्यंत मुले मुली असतांना या आश्रम शाळेत मुली साठी स्वतंत्र महिला अधिक्षकेची नेमणूक करण्यात आलेली नाही. महिला अधिक्षकेचे पद रिक्त आहे. तसेच या आश्रम शाळेत शिक्षकाना राहण्यासाठी निवासाची कोणतीही व्यवस्था नाही त्या मुळे शिक्षक शहराच्या ठिकाणी राहून ये जा करतात, तर मुख्याध्यापक कार्यालयातच झोपतो.आश्रम शाळेच्या आवारात पीडित मुलीचे नातेवाईक व शाळेचे विद्यार्थी अधिक्षकास बेदम मारहाण करीत असतांना काही मुले त्याचे व्हिडीओ चित्रण करीत होती. सहकारी शिक्षकांनी मात्र यावेळी बघ्याची भूमिका घेतली. याची माहिती मिळताच तलासरी पोलीस तात्काळ आश्रम शाळेत पोहोचले व ग्रामस्थांच्या तावडीतून अधीक्षकांनी सुटका करून पोलीस स्टेशनला आणले.तक्रारीमध्ये तफावत एवढा उशीर का?या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी विद्यार्थीनीच्या तक्रारीमध्येच तफावत असल्याची स्थिती आहे. तिने फिर्यादीमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये वसतिगृहामध्ये असतांना घरच्यांचा फोन आल्याचे सांगून विनयभंग केल्याचे सांगितले आहे.तर सहा. प्रकल्प अधिकारी संगीता हुलावळे यांच्याकडे व्यथा मांडतांना गणपतीमध्ये लज्जास्पद वर्तन केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गैरवर्तन घडल्यानंतर एवढे महिने ती गप्प का बसली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrimeगुन्हा