शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

पीन बोरर रोगामुळे मोगरा पिकाचे नुकसान; कृषी विभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 12:07 AM

सध्या मोठ्या प्रमाणात दररोज मोगरा कळी काढली जात आहे.

विक्रमगड :  विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांमध्ये फुलशेती केली जात असून, त्यात मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्यातील खांड, ओंदे, उघाणी, वाकी, पोचाडा, साखरा, अशा ४० ते ५० गावांत शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये मोगरा लागवड केली आहे. मात्र, त्याच वेळी मोगऱ्यावर पडलेल्या पीन बोरर रोगामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. या संदर्भातील तक्रारींनंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.

सध्या मोठ्या प्रमाणात दररोज मोगरा कळी काढली जात आहे. विक्रमगडची मोगरा कळी दादर व नाशिकच्या मार्केटला जाते. सद्यस्थितीत या फुलांची मागणी जरी वाढली असली, तरी थंडी सुरू झाल्याने मोगऱ्याचे उत्पादन काही प्रमाणात घटले आहे, तसेच पीन बोरर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

मोगरा कळी तयार होण्याचा कालावधीदरम्यान मोगरा कळीमधे लहान शेंद्री अळ्या तयार होऊन पूर्ण पीक वाया जाते. ज्या शेतकऱ्यांचे ८ ते १० किलो मोगऱ्याच्या कळीचे उत्पादन व्हायचे, तिथे थंडीमुळे व रोगामुळे उत्पादन कमी झाले आहे.  या रोगाची कृषी विभागाचे कृषी संशोधन केंद्र, पालघर येथील कीड व रोग शास्त्रज्ञ ढाणे व कृषी विभागाचे आर.यू. इभाड, कृषी सहायक एच.एन. गिरासे, एस.एस. गावित, माळगावी, ए.एस. भोडवे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार