शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आधुनिक शिक्षणात शाळांमधील पाटीपूजन झाले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 23:58 IST

पूर्वीच्या काळी शिक्षणाचा श्रीगणेशा म्हणजे एक दगडी पाटी आणि त्यासोबत पांढरी पेन्सिल असा होता.

पारोळ : पूर्वी दसऱ्याच्या दिवशी दगडाच्या पाटीवर देवी सरस्वतीचे चित्र काढून प्रत्येक शाळेत पाटीपूजन केले जात असे. पण आता या आधुनिक शिक्षण पद्धतीत पाट्यांनाच जागा नसल्याने ओघानेच पाटी पूजनही बंद झाले आहे.पूर्वीच्या काळी शिक्षणाचा श्रीगणेशा म्हणजे एक दगडी पाटी आणि त्यासोबत पांढरी पेन्सिल असा होता. विद्यार्थ्यांकडे या दोन गोष्टी असल्या की त्याचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होत होते. आज मात्र या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून गायब झाल्या असून दगडी पाटी तर कालबाह्यच झाली आहे. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या हातात वही -पेन आल्याने विद्यार्थ्यांना दगडी पाटी म्हणजे काय, हेच माहीत नाही.पूर्वी दसºयाच्या दिवशी अंक असलेले सरस्वती देवीचे चित्र पाटीवर काढत. ज्या व्यक्तीला हे चित्र काढता येत असे त्याच्याकडे दसºयाच्या आदल्या दिवशी हे चित्र पाटीवर काढण्यासाठी मुले गर्दी करत असत. सकाळी पूजेचे साहित्य घेऊन मुले शाळेत येत आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेसमोर दगडी पाटी ठेवून त्याचे सामूहिक पूजन करण्यात येत असे. आरती झाल्यानंतर मुले शिक्षकांचे आशीर्वाद घेत. केवळ या पूजनासाठी पूर्वी दसºयाच्या दिवशी काही वेळ शाळा सुरू ठेवली जात असे. मात्र, सध्या सुरू असलेल्या या शिक्षणात दसºयाला होणारे पाटीपूजन बंद झाले आहे. एवढेच नव्हे तर आज दगडी पाटीही कालबाह्य झाली आहे.असा होत होता दगडी पाटीचा उपयोगदगडी पाटीला असलेली चौकोनी लाकडी रेखीव कडा आणि त्यामध्ये काळ्याभोर रंगाची पाटी. आताही काही ठिकाणी कदाचित या पाटीचा वापर होत असेलही पण ती ही दगडी पाटी नव्हे.गेल्या आठ - दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाल्याचे हे द्योतक आहे. अनेक वर्षांपासून मुलांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये दगडी पाटीची भूमिका अतिशय मोलाची ठरत होती. विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवण्यापासून, अंकओळख करून देण्यापर्यंत या दगडी पाटीचा उपयोग होत होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार