शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 18:03 IST

वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला.

- मंगेश कराळे

नालासोपारा:- वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह माजी नगरसेवक प्रवीण भोईर, प्रफुल पाटील, पदाधिकारी जयेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्च्याला मार्गदर्शन करण्यासाठी शर्मिला राज ठाकरे या सुद्धा सामील झाल्या होत्या. आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नसून वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार असल्याचे भाषणात सांगून राज्य सरकारला ठणकावले आहे. तसेच पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांन वेळ नसल्यामुळे उदघाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेल्यामुळे वसई विरारकरांना पाच महिने पाण्यावाचून तडफडत ठेवण्यात आल्यामुळे मनसेने जाब विचारण्यासाठी मनपावर मोर्चा काढला होता. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी दुसर्‍या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही.

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत. जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन असे शर्मिला ठाकरे यांनी  यावेळी सरकारला ठणकावले. या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मनसेची आक्रमक भूमिका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विरार पोलिसांनी मोर्च्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवsharmila thackerayशर्मिला ठाकरेVasai Virarवसई विरार