शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 18:03 IST

वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला.

- मंगेश कराळे

नालासोपारा:- वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह माजी नगरसेवक प्रवीण भोईर, प्रफुल पाटील, पदाधिकारी जयेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्च्याला मार्गदर्शन करण्यासाठी शर्मिला राज ठाकरे या सुद्धा सामील झाल्या होत्या. आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नसून वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार असल्याचे भाषणात सांगून राज्य सरकारला ठणकावले आहे. तसेच पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांन वेळ नसल्यामुळे उदघाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेल्यामुळे वसई विरारकरांना पाच महिने पाण्यावाचून तडफडत ठेवण्यात आल्यामुळे मनसेने जाब विचारण्यासाठी मनपावर मोर्चा काढला होता. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी दुसर्‍या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही.

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत. जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन असे शर्मिला ठाकरे यांनी  यावेळी सरकारला ठणकावले. या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मनसेची आक्रमक भूमिका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विरार पोलिसांनी मोर्च्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवsharmila thackerayशर्मिला ठाकरेVasai Virarवसई विरार