शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 18:03 IST

वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला.

- मंगेश कराळे

नालासोपारा:- वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह माजी नगरसेवक प्रवीण भोईर, प्रफुल पाटील, पदाधिकारी जयेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्च्याला मार्गदर्शन करण्यासाठी शर्मिला राज ठाकरे या सुद्धा सामील झाल्या होत्या. आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नसून वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार असल्याचे भाषणात सांगून राज्य सरकारला ठणकावले आहे. तसेच पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांन वेळ नसल्यामुळे उदघाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेल्यामुळे वसई विरारकरांना पाच महिने पाण्यावाचून तडफडत ठेवण्यात आल्यामुळे मनसेने जाब विचारण्यासाठी मनपावर मोर्चा काढला होता. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी दुसर्‍या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही.

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत. जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन असे शर्मिला ठाकरे यांनी  यावेळी सरकारला ठणकावले. या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मनसेची आक्रमक भूमिका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विरार पोलिसांनी मोर्च्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवsharmila thackerayशर्मिला ठाकरेVasai Virarवसई विरार