शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पालकमंत्र्यावर आरोप प्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माफी मागावी; भाजपाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:55 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिउत्तर दिले.

-  मंगेश कराळे नालासोपारा - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक आणि एकदिलाने करत असलेले काम पाहून बविआच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिउत्तर दिले. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत; अन्यथा त्यांनी माफी मागावी. नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. 

पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक ठेकेदाराकडून २० कोटी रुपये जमा करण्यास पालिका अधिकाऱ्यांना सांगितल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भाष्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वैयक्तिक टीका केली होती. त्यांच्या या आरोपांतील निराधारता; किंबहुना आमदार  ठाकूर यांच्या माध्यमातूनच शहरात कशापद्धतीने गैरव्यवहार सुरू आहेत, याची माहिती देण्याकरता भाजपच्या वतीने गुरुवारी नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मनोज पाटील यांनी आमदार ठाकूर यांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांच्या आरोपांतील फोलपणा दाखवून दिला. आमदार ठाकूर हे बविआ हा पक्ष समजत असले तरी ती एक संघटना आहे. त्या संघटनेचा स्वत:चे चिन्ह नाही. या संघटनेचा दोन खाड्यांपुरता आवाका आहे. त्यांच्या या सीमितपणावर उपमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही राजकीय स्वरूपाची होती. पण या टीकेला आमदार ठाकूरांनी वैयक्तिक टीकतून उत्तर दिले आहे. त्यातून त्यांना आलेली वैफल्यता दिसून येते. पालकमंत्र्यांवरील खंडणीचे आरोप तर हास्यास्पद आहेत.

निवडणूक काळात अनेक पक्ष विविध औद्योगिक-सामाजिक संघटना आणि समाजातील घटक आणि व्यावसायिकांना भेटत असतात. त्यांच्यासोबत बैठका घेत असतात. पण आमदार हितेंद्र ठाकूर यांना या बैठका किंवा या संघटनांसोबतचा संवाद दिसला नाही. त्यांना केवळ कंत्राटदारच कसे दिसले? त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचेच कसे दिसले? असा प्रश्न मनोज पाटील यांनी केला. कदाचित वर्षभर आमदार ठाकूर अशाच पद्धतीने खंडणी वसूल करत असतात. त्यामुळे या बैठकांतून आपल्यासारखीच कुणी तरी खंडणी वसूल करत आहे, अशी पाल त्यांच्या मनात चुकचुकली असावी, त्यातून त्यांनी हा आरोप केला असावा, अशी शंका त्यांनी या वेळी व्यक्त केली.

वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४palgharपालघरBJPभाजपा