शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन नो प्लास्टिक’,‘पीईटी’वर पुनर्प्रक्रिया शक्य, सरकारच्या रडारवर पेट बॉटलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 03:17 IST

राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, ताट आणि पिशव्या अशा ठरावीक वस्तूंवर बंदी आणण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली आहे.

राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, ताट आणि पिशव्या अशा ठरावीक वस्तूंवर बंदी आणण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली आहे. तुर्तास पेट बॉटल्सवर बंदीची घोषणा झाली नसली, तरी राज्य सरकारच्या रडारवर पेट बॉटलही असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. मात्र गेल्या शतकातील सर्वात मोठे संशोधन मानल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी लादल्यास त्याला योग्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे का, यावर प्रकाश टाकण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टॅक्नोलॉजीच्या पॉलिमर्स आणि सर्फेस टॅक्नोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. जगताप यांच्याशी ‘लोकमत’ चे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी साधलेला संवाद...प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?- प्लॅस्टिकचा वापर आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात केला जातो. प्लॅस्टिक हे एक पॉलिमर मटेरियल असले, तरी त्याचे विविध प्रकार आहेत. जे विविध साहित्ये वापरून तयार केले जातात. त्यातलाच एक विशिष्ट प्रकार म्हणजेच पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट ज्याला सामान्य भाषेत ‘पीईटी’ असे म्हटले जाते. त्याचा सर्वात जास्त वापर घरगुती कामांसाठी केला जातो. पीईटी हे १०० टक्के रिसायकल करता येते. सध्या पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि प्रदूषणासाठी प्लॅस्टिकला जबाबदार धरण्यात येत आहे. पण वास्तविक बेजबाबदार पद्धतीने फेकला जाणारा कचरा आणि पर्यावरणाकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष हीच त्यामागील कारणे आहेत.प्लॅस्टिकसाठी काच हा योग्य पर्याय आहे का?- काचेच्या उत्पादन प्रक्रियेत पाणी आणि वाळू यासारख्या अमूल्य नैसर्गिक संपत्तीचा ºहास होतो. काचेच्या भांड्याच्या पुनर्वापराच्या आधी त्याला निर्जंतुक करणे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्यासाठी कोट्यवधी लीटर पाणी खर्च करावे लागेल. दुष्काळाशी चारहात कराव्या लागणाºया महाराष्ट्राला नक्कीच ते व्यवहार्य व नैतिकदृष्ट्या योग्य नाही. काचेची निर्मिती १ हजार ६०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये केली जाते. इतके उच्च तापमान तयार करण्यासाठी व ते राखून ठेवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज पडते. ज्याचा एकूण भार आपल्या पर्यावरणावर पडतो.पेट बॉटलवर बंदी घालण्याची गरज वाटते का?- प्लॅस्टिकमधील पीईटी उत्पादने ही तुलनेने पर्यावरणपूरक आहेत. कारण त्यांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी १५० अंश सेल्सिअस ते ३०० अंश सेल्सिअस इतकेच तापमान लागते. सध्या भारतात एकूण उत्पादित पीईटीपैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पीईटी हे रिसायकल होते. हा दर जगातील सगळ्यात जास्त दर आहे. त्यामुळे मूळ समस्या ही प्लास्टिक नसून त्याच्याशी निगडित असलेले आपले वागणे हेच आहे.प्लॅस्टिकमुळे उद्भवणाºया समस्यांवर उपाय काय?- पीईटीवर सरसकट बंदी हा या समस्येमागचा तोडगा नसून समाजात स्वच्छतेबद्दल आणि कचºयाचे वर्गीकरण करून प्लॅस्टिकच्या रिसायकलिंगचा जास्तीत जास्त प्रसार करणे हे आहे. सध्याची परिस्थिती बघता, पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि त्याची पुढील हानी रोखण्यासाठी सक्तीचे पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यासाठी महत्त्वाच्या सार्वजनिक जागांवर रिव्हर्स वेन्डिंग मशीन्स लावून रिसायकलिंगला एकूणच प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवायला हवेत. एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की आपली जबाबदारी समजून प्रत्येक संसाधनाचा योग्य वापर करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी. हा एक बदलच या समस्येवर दीर्घकालीन आणि शाश्वत उत्तर ठरेल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी