शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास मंत्रालयाचा महापालिकेस दणका; नगररचना उपसंचालक संजय जगताप यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 20:37 IST

उपसंचालक असलेल्या संजय जगताप यांची काही महिन्यापूर्वीच वसई-विरार शहर महापालिकेतून अन्यत्र बदली करण्यात आली होती.

वसई: वसई-विरार शहर महापालिकेच्या नगररचना विभागाचे वादग्रस्त प्रभारी उपसंचालक संजय जगताप यांच्यावर संचालक, नगरपालिका प्रशासन यांच्या कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी लोकमतला दिली.

 

उपसंचालक असलेल्या संजय जगताप यांची काही महिन्यापूर्वीच वसई-विरार शहर महापालिकेतून अन्यत्र बदली करण्यात आली होती, तर विशेष म्हणजे या बदली आदेशात बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू व्हावं अथवा बदली थांबण्यासाठी कुठलाही दबाव आणू नये असे स्पष्ट लेखी निर्देश देण्यात आले होते, एकुणच या विभाग स्थापनेपासूनच जगताप यांना हा विभाग वादग्रस्त ठरला होता.

तरी येथे नव्या बांधकामांना परवानगी देताना विकासकांकडून प्रतिचौरस फूटामागे विशिष्ट अतिरिक्त "झेड फंड" हा बेकायदेशीरपणे वसूल केला जात असल्याचा गंभीर आरोप यापूर्वी पोटनिवडणुक व विधानसभा -2019 च्या निवडणूकामध्ये झाला होता.

त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात हा मुद्दा बऱ्यापैकी उचलून धरला होता. तर याच कळीच्या मुद्द्यावरून मागील महिन्यात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढवलेल्या सेना उमेदवार विजय पाटील यांच्यात एका शैक्षणिक कार्यक्रमात शाब्दिक चकमक देखील उडाली होती.

दरम्यान नगरपालिका संचलन कार्यालयाने निलंबनाची कारवाई केलेले संजय जगताप यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला असून मात्र ही कारवाई करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची आगाऊ नोटीस बजावण्यात आली नाही किंवा आपलं म्हणणं मांडण्याची संधी देखील देण्यात आली नाही असे म्हंटल आहे.

दरम्यान प्रशासकीय कायद्यातील सेवा नियमानुसार  एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करावयाची असल्यास प्रथम  त्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर अथवा बाधित कर्मचारी यास लेखी नोटीस देणे आवश्यक असते, मात्र याबाबत जगताप  यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठलही भाष्य केलेंल नाही,याउलट आता उपसंचालक पदी कोण हे मात्र कोड बनून राहिले आहे.

किंबहुना आधिच याठिकाणी दोन महिने झाले वसई विरार महापालिका प्रशासनाला आयुक्त नाही,उपायुक्त नाही आणि आता शहराचे नियोजन करणारा नगररचना विभागाचा अधिकारी नाही त्यामुळे ही तर मोठी शोकांतिका असल्याचे करदाते नागरिक बोलत आहेत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार