शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नगरविकास मंत्रालयाचा महापालिकेस दणका; नगररचना उपसंचालक संजय जगताप यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 20:37 IST

उपसंचालक असलेल्या संजय जगताप यांची काही महिन्यापूर्वीच वसई-विरार शहर महापालिकेतून अन्यत्र बदली करण्यात आली होती.

वसई: वसई-विरार शहर महापालिकेच्या नगररचना विभागाचे वादग्रस्त प्रभारी उपसंचालक संजय जगताप यांच्यावर संचालक, नगरपालिका प्रशासन यांच्या कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी लोकमतला दिली.

 

उपसंचालक असलेल्या संजय जगताप यांची काही महिन्यापूर्वीच वसई-विरार शहर महापालिकेतून अन्यत्र बदली करण्यात आली होती, तर विशेष म्हणजे या बदली आदेशात बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू व्हावं अथवा बदली थांबण्यासाठी कुठलाही दबाव आणू नये असे स्पष्ट लेखी निर्देश देण्यात आले होते, एकुणच या विभाग स्थापनेपासूनच जगताप यांना हा विभाग वादग्रस्त ठरला होता.

तरी येथे नव्या बांधकामांना परवानगी देताना विकासकांकडून प्रतिचौरस फूटामागे विशिष्ट अतिरिक्त "झेड फंड" हा बेकायदेशीरपणे वसूल केला जात असल्याचा गंभीर आरोप यापूर्वी पोटनिवडणुक व विधानसभा -2019 च्या निवडणूकामध्ये झाला होता.

त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात हा मुद्दा बऱ्यापैकी उचलून धरला होता. तर याच कळीच्या मुद्द्यावरून मागील महिन्यात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढवलेल्या सेना उमेदवार विजय पाटील यांच्यात एका शैक्षणिक कार्यक्रमात शाब्दिक चकमक देखील उडाली होती.

दरम्यान नगरपालिका संचलन कार्यालयाने निलंबनाची कारवाई केलेले संजय जगताप यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला असून मात्र ही कारवाई करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची आगाऊ नोटीस बजावण्यात आली नाही किंवा आपलं म्हणणं मांडण्याची संधी देखील देण्यात आली नाही असे म्हंटल आहे.

दरम्यान प्रशासकीय कायद्यातील सेवा नियमानुसार  एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करावयाची असल्यास प्रथम  त्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर अथवा बाधित कर्मचारी यास लेखी नोटीस देणे आवश्यक असते, मात्र याबाबत जगताप  यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठलही भाष्य केलेंल नाही,याउलट आता उपसंचालक पदी कोण हे मात्र कोड बनून राहिले आहे.

किंबहुना आधिच याठिकाणी दोन महिने झाले वसई विरार महापालिका प्रशासनाला आयुक्त नाही,उपायुक्त नाही आणि आता शहराचे नियोजन करणारा नगररचना विभागाचा अधिकारी नाही त्यामुळे ही तर मोठी शोकांतिका असल्याचे करदाते नागरिक बोलत आहेत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार