शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाडा बसस्थानक तडकाफडकी स्थलांतरीत

By admin | Updated: March 21, 2017 01:35 IST

येथील बस स्थानक नव्या जागी अचानक स्थलांतरीत करण्याच्या एस.टी.आगाराच्या निर्णयामुळे प्रवासी, चाकरमानी, व विद्यार्थ्यांचे

वाडा : येथील बस स्थानक नव्या जागी अचानक स्थलांतरीत करण्याच्या एस.टी.आगाराच्या निर्णयामुळे प्रवासी, चाकरमानी, व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. सोमवारी बससेवा एस. टी.आगार येथील नवीन बसस्थानकापासून सुरू करण्याच्या निर्णयाने परगावीच्या बस या खंडेश्वरी नाका येथूनच वळविण्यात येत होत्या, तर वाडा आगारातून सुटणाऱ्या भिवंडी, कल्याण, ठाणे, नगर, पुणे, इत्यादी बसेस या जुन्या स्थानकातसुद्धा येणार असल्याचे आगारामार्फत सांगण्यात येत होते.सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने आजूबाजूच्या परिसरातील इतर आगाराच्या बसने आलेले विद्यार्थी खंडेश्वरी नाक्यापासून धावपळ करीत परिक्षा केंद्रावर पोहचत होते. खंडेश्वरी नाका येथे बस पकडणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे आणि असुरक्षित आहे कारण तिथे कोणतीही शेड नाही आणि त्या रस्त्यावरून अवजड वाहने, ट्रक्स, आणि इतर वाहनांची सतत भरधाव वाहतूक सुरु असते त्यामुळे त्या ठिकाणी एसटी पकडण्याच्या धावपळीत अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे मत विद्यार्थी व प्रवासी व्यक्त करत आहेत. जुने वाडा शहर ते नवीन बस स्थानक हे अंतरही लांबचे असल्याने रिक्षा किंवा इतर वाहनाने नवीन बस स्थानकापर्यंत पोहचावे लागणार आहे. यात सर्वात अधिक पीडला जाणार आहे तो सामान्य व गरीब प्रवासी कारण रिक्षाचे भाडे त्याला परवडणारे नाही. नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस स्थानक हे पूर्ण पडक्या स्थितीत असून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, लाईट, पंखे, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, गाड्यांचे वेळापत्रक, फलाट, उपहारगृह अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत तरीही घाईघाईने बसस्थानक स्थालांतरित का करण्यात आले असा संतप्त सवाल प्रवासी, विद्यार्थी व सामान्य नागरिक करीत आहेत. वाहतूक समस्या व अवैध वाहतूक यासंदर्भात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भात विचार विनिमय झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही दिवसांत एसटी आगाराच्या जागेत बांधून तयार असलेले बस स्थानक दुरुस्त करून तिथे अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा एसटीचा प्रयत्न राहील व तिथेच बाहेरील डेपोच्या बसेससाठी स्थानक सुरु होईल, असे समजते. (वार्ताहर )