शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तारापूर प्रदूषण नियंत्रणासाठी बैैठक; पालकमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:04 IST

मंत्रालयात घेतली तातडीची बैठक, दिले महत्वपूर्ण आदेश

पंकज राऊत बोईसर : राष्ट्रीय हरित लवादाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत संपूर्ण देशात तारापूर प्रथम क्र मांकाचे प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र असल्याचे जाहीर करताच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या दालनात मंगळवार (दि.२३) तातडीची बैठक घेऊन तारापूरचे प्रदूषण नियंत्रणात आणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक सूचना तर काही त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्यासंदर्भात सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या बैठकीला दहिसर (मुंबई) च्या आमदार मनीषाताई चौधरी, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कैलास शिंदें, एमआयडीसीचे संतोष कारंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुर राऊत, म.प्र.नि.मंडळ (सायन) श.च. कोलकर, एम.आय.डी.सी.चे सल्लागार (पर्यावरण), पी.पी.नांदुसेकर, एम.आय.डी.सी. तारापूरचे उपअभियंता, आर.जी.तोतला, तसेच म.प्र.नि. मंडळाच्या तारापूर एकचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, तारापूर दोनचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी डॉ.अर्जुन जाधव, तारापूर येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापक जाधव तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुका युवा अध्यक्ष प्रणय म्हात्रे, नितीन राऊळ, जयेश घरत उपस्थित होते.

बैठकीत आ.चौधरी यांनी पालघरच्या समस्याबरोबरच तारापूरमधील प्रदूषणाबाबतचे भीषण वास्तव प्रखरपणे मांडले तर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांचे भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश देऊन नवीन ५० एम.एल.डी. क्षमतेच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रापैकी प्रथम २५ एम.एल.डी. प्रकल्प लवकरात कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तर एम.एस.ई.डी.ने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी त्वरित विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश देऊन सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत तारापूर एम.आय.डी.सी.मध्ये रासायनिक टँकरला प्रवेश बंद करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले तर मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही लावून त्याचे मॉनिटरिंग करून कारखान्यातील बोअरवेलच्या पाणी वापरावर व ते वाहून नेणाºया टँकरवर बंदी घालण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी एमआयडीसीमधील प्रेशर अ‍ॅण्ड नॅचरल गॅस वाहिनी टाकण्याचे काम पूर्ववत सुरू करण्यास सांगितले. मात्र ते काम पावसाळ्यानंतर सुरू केले जावे, अशी सूचना केली. तर एम.पी.सी.बी.च्या मापदंडाप्रमाणेच कारखान्यांनी रासायनिक सांडपाणी सोडावे असे आदेश दिले.