शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पाथर्डीकरांना मनसेने दिले भरपूर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:02 IST

केवळ आंदोलन नाही : शाश्वत स्वरूपाचे काम यापुढेही करणार - कुंदन संखे

हुसेन मेमन जव्हार : पालघर जिल्ह्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरु असून, पिण्यासाठी तीला पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. त्यामुळेच पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जव्हार तालुक्यामधील मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या पाथर्डी गावांत पाण्याच्या चार टाक्या बसवून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

आज पालघर जिल्हा संपूर्ण दुष्काळाच्या सावटा खाली असून, शेकडो गावे ओसाड पडली आहेत. पाण्याअभावी लाखो लोकांनी स्थलांतर केलेले आहे. जनतेचे जीवनच उद्ध्वस्त करणारी भयाण परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन नावाच्या विक्राळ व्यवस्थेने झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप कुंदन संखे यांनी करून, दुष्काळ निवारण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु प्रभावी अंमलबजावणी बरोबरच सेवेची दूरदृष्टी हे सरकार हरवून बसले असल्यामुळे संखे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे ढिम्म शासनच्या विरोधात केवळ आंदोलनाची भूमिका न घेता, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कुंदन संखे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जव्हारमधील दुर्गम भागातील आणि मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या पाथर्डी गावात पाण्याच्या चार टाक्या बसवून दिल्या. जेणेकरून सर्वसामान्य जनतेची पाण्यासाठी होणारी पायपीट आणि जीवघेणी धडपड कमी होईल. आणखी ३ ते ४ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, तालुका अध्यक्ष गोपाळ वझरे, उपतालुका अध्यक्ष सोमनाथ पिठोले, पालघर तालुका सचिव दिनेश गवई, शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर, निलेश घोलप, मनविसेचे पालघर विधानसभा सचिव जालीम तडवी, शिवा यादव, बाळू दापट, विलास सापटे, अतुल खरपडे, संदीप जाधव, देवा टोकरे, परशुराम वझरे, कैलास नवले, संतोष वझरे, किसन भोये, प्रमिला वझरे, शबी वझरे, जाई खरपडे, सुनीता पिठोले, सपना भुजड, तसेच मनसे सैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीMNSमनसे