शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

वसईत सुपारीच्या झाडांवर संक्रांत, होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:18 IST

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो.

वसई : भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. वसईत दरवर्षी होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. परंपरेच्या नावाखाली ग्रामीण भागात सुपारी व भेंडीची झाडे कापून त्याची होळी केली जाते. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते.वसईतील ग्रामीण भागात पूर्वापार सुपारी तसेच भेंडीची झाडे होळीसाठी कापली जातात. यानिमित्त शेतीवाडीची साफसफाई होत असते. ग्रामीण भागात ‘एक गांव, एक होळी’ किंवा ‘एक आळी एक होळी’ ही संकल्पना असते. संकल्पना असते.मात्र सद्या शहरी भागातील निवासी संकुलात एक इमारत एक होळी पेटवली जाते. आता हे लोण शहरी भागातही पसरते आहे. केरकचरा आणि अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करण्याऐवजी शहरातील तरुणाई ग्रामीण भागातून सुपारीची झाडे कापून खरेदी करत आहेत. यात शेकडोच्या संख्येने सुपारीच्या झाडांची कत्तल करण्यात येते. ५०० ते २००० रूपये किमतीने हि झाडे होळी साठी कापली जातात. विशेष म्हणजे सुपारीच्या झाडांना गाभ्यातून विशिष्ट प्रकारची कोती असलेले झाड निवडले जाते. बॅन्जोच्या तालावर वाजत गाजत ट्रकमधून झाडे शहरात नेली जातात.विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनाच्या एक दिवस आधी होळी साजरी होणार आहे. ‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश दिला जात असताना हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे. वनदिवसाच्या एक दिवस आधीच वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित असतात. होळीच्या निमित्ताने दुर्गुणांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जाते. जागतिक वनदिनी वनाचीच होळी होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.दरवर्षी होळी सणानिमीत्त महाराष्टात सर्रास झाडांची कत्तल करत त्यांची सण-उत्सवाच्या नावाखाली होळी केली जाते.शहरी भागात जर होळी उत्सवासाठी ग्रामीण भागातून झाडे कापून जाळण्यासाठी आणण्यात येत असतील तर याबाबत चौकशी करण्यात येईल व यावर बंदी घालण्यात येईल.- बळीराम पवार, आयुक्त,वसई-विरार महानगरपालिकावसईतील ग्रामीण भागात पुर्वापार एक गांव एक होळी हि संकल्पना आहे.सुपारी अथवा भेंडीच्या झाडाची फांदी होळीसाठी वापरली जाते.मात्र गेल्या काही वर्षात शहरी भागात या उत्सवाचे व्यापारिकरण सुरू झालेले आहे.ग्रामीण भागातून बेसूमार झाडांची कत्तल केली जात आहे.- समिर वर्तक, समन्वयक,पर्यावरण संवर्धन समिती वसईहोळीसाठी बाजारजव्हार : जव्हार तालुका हा बहुतांश ग्रामीण आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, तालुक्यातील लोकसंख्येसाठी जव्हार हीच एकमेव मोठी बाजारपेठ आहे. खेडोपाडयातील आठवडा भूरकुंड्या बाजारपेठत मंगळवारी मोठी गर्दी झाली होती.आदिवासी गावपाड्यांवर आठवडा बाजार भरतो. होळीसाठी किराणा सामान, कपडे, नारळ, खोबरा, हिरडा, रवा, साखर, गुळ आदी सामानांची दुकाने छोटेमोठे व्यापारी रस्त्यांवर मांडून बसतात. होळी हा सण ग्रामीण आदिवासी भागात मोठा मानला जातो.या सणाला रवा, मैदा, गुळ, खोबरा, नारळ, साखर आदी सामान खरेदी हे होळीचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या वर्षी १० ते १५ रूपये नग विकला जाणारा नारळ यंदा २५/- रूपयांनी विक्र ी केला जात असल्यामुळे विक्र ी होणार की नाही असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. यंदा थोड्याफार प्रमाणात दरवाढ झालेली आहे.

टॅग्स :HoliहोळीVasai Virarवसई विरार