शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

वसईत सुपारीच्या झाडांवर संक्रांत, होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:18 IST

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो.

वसई : भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. वसईत दरवर्षी होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. परंपरेच्या नावाखाली ग्रामीण भागात सुपारी व भेंडीची झाडे कापून त्याची होळी केली जाते. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते.वसईतील ग्रामीण भागात पूर्वापार सुपारी तसेच भेंडीची झाडे होळीसाठी कापली जातात. यानिमित्त शेतीवाडीची साफसफाई होत असते. ग्रामीण भागात ‘एक गांव, एक होळी’ किंवा ‘एक आळी एक होळी’ ही संकल्पना असते. संकल्पना असते.मात्र सद्या शहरी भागातील निवासी संकुलात एक इमारत एक होळी पेटवली जाते. आता हे लोण शहरी भागातही पसरते आहे. केरकचरा आणि अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करण्याऐवजी शहरातील तरुणाई ग्रामीण भागातून सुपारीची झाडे कापून खरेदी करत आहेत. यात शेकडोच्या संख्येने सुपारीच्या झाडांची कत्तल करण्यात येते. ५०० ते २००० रूपये किमतीने हि झाडे होळी साठी कापली जातात. विशेष म्हणजे सुपारीच्या झाडांना गाभ्यातून विशिष्ट प्रकारची कोती असलेले झाड निवडले जाते. बॅन्जोच्या तालावर वाजत गाजत ट्रकमधून झाडे शहरात नेली जातात.विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनाच्या एक दिवस आधी होळी साजरी होणार आहे. ‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश दिला जात असताना हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे. वनदिवसाच्या एक दिवस आधीच वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित असतात. होळीच्या निमित्ताने दुर्गुणांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जाते. जागतिक वनदिनी वनाचीच होळी होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.दरवर्षी होळी सणानिमीत्त महाराष्टात सर्रास झाडांची कत्तल करत त्यांची सण-उत्सवाच्या नावाखाली होळी केली जाते.शहरी भागात जर होळी उत्सवासाठी ग्रामीण भागातून झाडे कापून जाळण्यासाठी आणण्यात येत असतील तर याबाबत चौकशी करण्यात येईल व यावर बंदी घालण्यात येईल.- बळीराम पवार, आयुक्त,वसई-विरार महानगरपालिकावसईतील ग्रामीण भागात पुर्वापार एक गांव एक होळी हि संकल्पना आहे.सुपारी अथवा भेंडीच्या झाडाची फांदी होळीसाठी वापरली जाते.मात्र गेल्या काही वर्षात शहरी भागात या उत्सवाचे व्यापारिकरण सुरू झालेले आहे.ग्रामीण भागातून बेसूमार झाडांची कत्तल केली जात आहे.- समिर वर्तक, समन्वयक,पर्यावरण संवर्धन समिती वसईहोळीसाठी बाजारजव्हार : जव्हार तालुका हा बहुतांश ग्रामीण आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, तालुक्यातील लोकसंख्येसाठी जव्हार हीच एकमेव मोठी बाजारपेठ आहे. खेडोपाडयातील आठवडा भूरकुंड्या बाजारपेठत मंगळवारी मोठी गर्दी झाली होती.आदिवासी गावपाड्यांवर आठवडा बाजार भरतो. होळीसाठी किराणा सामान, कपडे, नारळ, खोबरा, हिरडा, रवा, साखर, गुळ आदी सामानांची दुकाने छोटेमोठे व्यापारी रस्त्यांवर मांडून बसतात. होळी हा सण ग्रामीण आदिवासी भागात मोठा मानला जातो.या सणाला रवा, मैदा, गुळ, खोबरा, नारळ, साखर आदी सामान खरेदी हे होळीचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या वर्षी १० ते १५ रूपये नग विकला जाणारा नारळ यंदा २५/- रूपयांनी विक्र ी केला जात असल्यामुळे विक्र ी होणार की नाही असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. यंदा थोड्याफार प्रमाणात दरवाढ झालेली आहे.

टॅग्स :HoliहोळीVasai Virarवसई विरार