शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

आपल्या हक्कांसाठी मराठ्यांना लढावे लागेल

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

पालघर आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून, त्यासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासकीय नोकऱ्यात प्राधान्याने दिले जाणार

वसई : पालघर आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून, त्यासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासकीय नोकऱ्यात प्राधान्याने दिले जाणार आहेत. त्यामुळे आपला लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना शिरीष चव्हाण यांनी मराठा मूक मोर्चा निमित्ताने नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले.पालघर येथे २३ आॅक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी नालासोपारातील तुळींज येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिरीष चव्हाण, राजाराम मुळीक, रत्नदिप बने, विश्वास सावंत, प्रभा सुर्वे, नंदकुमार पवार, श्रद्धा मोरे, वर्षा सावंत, जुही चव्हाण यांनी आपापले विचार मांडले. यावेळी अनेक नगरसेवकांसह महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकरी हे मराठा होते. तुमच्या मागण्यांच्यावेळी आम्ही पाठींबा दिला आता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, असे आवाहन राजाराम मुळीक यांनी यावेळी केले. पेटून उठायची वेळ कधीच निघून गेली आहे.आता शस्त्र हाती घेण्याची वेळ आली आहे. स्त्री ही चैनीची वस्तू नाही हे दाखवून द्या, असे आवाहन यावेळी प्रभा सुर्वे यांनी केले. दरम्यान, मराठा क्रांती मूक मोर्चासाठी महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांनी पाठिंंबा देत १६ हजार रुपयांची देणगी दिली आहे. (प्रतिनिधी)