शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मनोरची रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’

By admin | Updated: September 8, 2015 23:25 IST

ग्रामीण भागातील आदिवासी रूग्णांसाठी वरदान ठरणारे ग्रामीण रूग्णालय ऐन पावसाळ्यात पाच दिवसापासून ओस पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या रूग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे.

- आरिफ पटेल,  मनोरग्रामीण भागातील आदिवासी रूग्णांसाठी वरदान ठरणारे ग्रामीण रूग्णालय ऐन पावसाळ्यात पाच दिवसापासून ओस पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या रूग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे. एकही वैद्यकीय अधिकारी, नर्स व इतर कर्मचारी नसल्याने रूग्णालय ओस दिसत आहे.शासनाने पालघर तालुक्यातील ७० ते ७५ गावामधील रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून कोट्यावधी खर्च करून ५० खाटांचे मनोर रूग्णालय तयार केले. त्यामध्ये सुरूवातीला वैद्यकीय अधिक्षक तीन डॉक्टर्स, नर्स, क्लार्क अशी अनेक पदे भरली होती. १०० ते १२५ रूग्णांची ओपीडी चालत होती. काही रूग्णांना उपचारासाठी दाखलही करून घेतले जात होते. परंतु आता परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून एकही वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचारी मिळत नाही. त्यामुळे येणारे रूग्णांचे प्रचंड हाल झालेले आहेत. गोरगरीब रूग्णांना आपल्या आजारावर उपचार करणे अशक्य झाले आहे.याबाबत काही रूग्णांनी मंगळवारी मनोर ग्रामपंचायतीला भेट देऊन सांगितले की, रुग्णालयात एकही डॉक्टर तसेच कर्मचारी नाही. त्यावेळी मनोर ग्रामपंचायत सरपंच संतोष माळी, उपसरपंच मोमेज रईस, सदस्य अनंत पुजारा, केतन पाडोसा व इतर सदस्य तसेच ग्रामस्थ अब्दुल पठान इकबाल चिखलेकर, बिलाल रईस रूग्णालयाला भेट दिली तसेच तातडीने सिओ, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन डी. एच. ओ यांना पत्र लिहून लवकरात लवकर ग्रामीण रूग्णालय सुरू करून रूग्णाचे हाल थांबवावे, अशी विनंती केली.