शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोकणात आंब्याचा हंगाम यंदा मे अखेरीस? खराब हवामानाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:26 IST

बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे.डहाणू तालुक्यात ६१७.३२ हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. या मध्ये समुद्रकिनाऱ्यालगतचे आणि डोंगरी भागातील बागायती असे दोन प्रकार पाहावयास मिळतात. एकाच भौगोलिक क्षेत्रात माती आणि हवेतील क्षारता या मुळे चवीत थोडा फार फरक असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. रायवळ, राजापुरी, तोतापूरी अशा अन्य जातींसह पिकलेल्या आंब्याच्या विक्र ीकरिता केशर आणि हापूसची लागवड दिसून येते. त्या पैकी बोर्डी परिसरातील काही प्रगतीशील शेतकºयांनी रत्नागिरी येथून तीन ते चार वर्षांची हापूस आंब्याची कलमे आणून त्याची लागवड बागायतीत केली आहे. व्यापारी उद्दिष्टाने लागवड केलेल्या हापूस आंब्याची निर्यात मलेशियासह अन्य देशात केली जाते. मात्र आजही हा व्यवहार एजंट मार्फत होत असल्याने उत्पादकांना आर्थिक झळ सोसावीच लागते.दरम्यान डिसेंबर महिन्यात झालेले ओखी वादळ आणि त्यानंतरच्या काळात ढगाळ वातावरणामुळे पालघर जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन या वर्षी १० ते १५ टक्केच शिल्लक आहे. फळांचा आकार लहान असून रंग अपेक्षेप्रमाणे नाही. त्या मध्ये बरीचशी फळं डागाळलेली आहेत. विशेषत: ही फळं पिकण्याचा हंगाम मे अखेरीस असेल. त्यामुळे पावसाच्या संपर्कात येऊन नासधूस होणार असल्याची खंत बागायतदारांनी व्यक्त केली आहे.करंड्या, बॉक्स यांनाही फटकाबोर्डी परिसरात आंब्याची निर्यात करण्यासाठी बांबूपासून बनविलेल्या टोपल्या (करंडे) आणि हल्ली पुठ्याचे बॉक्स यांचा वापर केला जातो. त्या मध्ये करंज झाडाची पाने ठेवली जातात. त्या मुळे फळे पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया होऊन त्याला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. भाताच्या पावळीचा वापरही केला जातो. मात्र उत्पादन नसल्याने बांबूच्या टोपाल्यांची मागणी घटल्याने बुरूड व्यवसाय करणाºया महिला व्यवसायिकांना झळ पोहचणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी फळे पॅकेजिंगचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. मात्र नैसर्गिक आपत्तीने स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम केला आहे.हवामानातील बदलाने या वर्षी आंबा पीक वाया गेले आहे. फळांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. साधारणत: एप्रिल मध्यानंतर तयार हापूस आंबा मलेशियात निर्यात केला जातो. मात्र या वर्षी मागणी असूनही उत्पादन नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.- यज्ञेश सावे, कृषीभूषण

टॅग्स :Mangoआंबाkonkanकोकण