शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कुपोषणाचा विळखा पुन्हा घट्ट, आॅगस्ट २०१७ ची धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:28 IST

पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे.

रवींद्र साळवेमोखाडा : पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे.सद्यस्थितीत पालघर जिल्हात तालुकानिहाय तलासरी २४८, जव्हार १ - १५१, जव्हार २- १९१, विक्र मगड ३०८, मोखाडा २२९, डहाणू ४०८, कासा २३१, वाडा १ - १३९, वाडा २ - २७१, पालघर ३५४, मनो २६२, वसई १ - २०५, वसई २ - १८४ अशा एकुण ३,१८१ इतक्या अंगणवाड्या आहेत. या केंद्रातील जुलै २०१७ च्या अखेरीस ग्राम बाल विकास केंद्राच्या ङ्कअहवाला नुसार प्राप्त झालेल्या कुपोषित बालकांच्या यादी नुसार सॅम म्हणजेच (तिव्र कुपोषित बालके) तालुका निहाय डहाणू १५६, तलासरी १८, मोखाडा ४१, जव्हार १४१, विक्रमगड १२८, वाडा १०१, पालघर ३८, वसई ३२ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण ६५५ तिव्र कुपोषित बालके आहेत. तसेच मॅम या मध्यम कुपोषित बालकांच्या श्रेणीमध्ये डहाणू ३८४, तलासरी ३२८, मोखाडा २६४, जव्हार ८४७, विक्र मगड ७३८, वाडा ५२५, पालघर ३८१, वसई १५४ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण ३,६२१ मध्यम कुपोषित बालके आहेत. तर तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची जिल्हातील एकूण आकडेवारी बघता ४,२७६ एवढी आहे.त्याचप्रमाणे आॅगस्ट महिन्यामध्ये २,६०३ एवढी कुपोषित बालके असून यातील ५११ बालके आज ही तिव्र कुपोषित म्हणजेच सॅम श्रेणीत आहेत तर २०९२ बालके मध्यम कुपोषित म्हणजेच मॅम श्रेणीत आहेत. विशेष म्हणजे जिल्हातील ० ते ६ वयोगटातील बालकांचा कुपोषित, भुकबळी आदी विविध कारणामुळे झालेल्या बालमृत्यूचे प्रमाण देखील अधिक असून एप्रिल २०१७ ते आॅगस्ट २०१७ अखेर पर्यत डहाणू तालुक्यात ५४, जव्हार ४४, विक्रमगड १९, मोखाडा ११, पालघर ३२, तलासरी १६, वाडा १३, वसई १५ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण २०४ कुपोषीत बालके भुकबळी आदी विविध कारणामुळे दगावली आहेत.महत्वाचे म्हणजे ११ सप्टेंबर २०१७ रोजी अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपा दरम्यान अंगणवाडी केंद्र वा बालकांचा सकस आहार बंद असल्याने तसेच शासनाच्या तोकड्या सकस आहार देण्याच्या कार्यकाळात पालघर जिल्हात ११ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या १४ दिवसाच्या कालावधीत ० ते १ वयोगटातील १० कुपोषितांचा तर १ ते ६ वयोगटातील ५ कुपोषित बालकांचा मृत्यू म्हणजे एकंदर १५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे जिल्हा भरातील आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी राबविण्यात येणाºया योजना अथवा यंत्रणा किती सक्षम आहेत हे यावरु ण कळते.