शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
4
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
5
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
6
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
7
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
9
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
10
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
11
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
12
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
13
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
15
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
16
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
17
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
18
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
19
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
20
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

माकुणसार खाडी पूल सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:47 IST

दुरूस्तीचे काम वेगात; वाहतुकीस आहे ठणठणीत, तक्रारीत तथ्य नाही

पालघर : सफाळे-केळवे, माहिम, पालघर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पूल अतिशय धोकादायक स्थितीत असल्याबाबत तक्रारी होत्या. याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हा पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचे व दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बढे यांनी लोकमतला सांगितले.पालघर तालुक्यातील झाई-बोर्डी -रेवस-रेड्डी-सातर्डे या प्रमुख राज्यमार्ग क्र मांक ४ दर्जाच्या रस्त्यावर ७९/१०० किमीमध्ये माकुणसार खाडीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे या पुलाचे बांधकाम सन १९६८ साली करण्यात आलेले आहे. पुलाची रचना ही प्रत्येकी वीस मीटरचे ७ गाळे अशी असून पुलाची एकूण लांबी १४० मीटर इतकी आहे. या पुलाची दुरवस्था झाल्याच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्यानंतर विधानपरिषदेत सेनेचे आमदार रवींद्र फाटक आणि प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) मुंबई या संस्थेमार्फत पूलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) सन २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे. या लेखा परीक्षण अहवालानुसार या पुलाचे दुरुस्तीचे कामास गट ‘क’ अंतर्गत रुपये ३ कोटी ५० लक्ष इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून सद्यस्थितीत पुलाच्या पायाच्या व स्तंभाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीत असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महेंद्र किणी यांनी लोकमतला दिली.या पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पाहणी पुनश्च अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे व व्हीजेटीआय मुंबई संस्थेच्या प्राध्यापकांनी दिनांक २० एप्रिलला २०१९ रोजी प्रत्यक्ष केली आहे. व्हीजेटीआय संस्थेमार्फत प्राप्त पाहणी अहवालानुसार (पुलाच्या स्तंभाचे काम दुरुस्ती करून) पुलाच्या वरील भागाचे (सुपरस्ट्रक्चर)चे नव्याने बांधकाम करणे आवश्यक असून सुपरस्ट्रक्चरच्या नव्याने बांधकामासाठी साधारणपणे ३ कोटी रुपये एवढा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती तारांकित प्रश्नाला उत्तर देताना देण्यात आली आहे.हे काम येत्या जून २०१९ च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरकडून प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे वृत्त पसरविणे चुकीचे असून व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ समितीने पाहणी करून हा पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचा अहवाल दिला आहे.प्रवासी संघटनेची मागणीसप्टेंबर महिन्यात या पुलाच्या बांधकामातील शिगा बाहेर येत अनेक ठिकाणी तडे गेल्याने पुलाला भासणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करु न पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे, अशी विनंती वजा मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :palgharपालघरroad safetyरस्ते सुरक्षा