शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

माकुणसार खाडी पूल सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:47 IST

दुरूस्तीचे काम वेगात; वाहतुकीस आहे ठणठणीत, तक्रारीत तथ्य नाही

पालघर : सफाळे-केळवे, माहिम, पालघर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पूल अतिशय धोकादायक स्थितीत असल्याबाबत तक्रारी होत्या. याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हा पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचे व दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बढे यांनी लोकमतला सांगितले.पालघर तालुक्यातील झाई-बोर्डी -रेवस-रेड्डी-सातर्डे या प्रमुख राज्यमार्ग क्र मांक ४ दर्जाच्या रस्त्यावर ७९/१०० किमीमध्ये माकुणसार खाडीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे या पुलाचे बांधकाम सन १९६८ साली करण्यात आलेले आहे. पुलाची रचना ही प्रत्येकी वीस मीटरचे ७ गाळे अशी असून पुलाची एकूण लांबी १४० मीटर इतकी आहे. या पुलाची दुरवस्था झाल्याच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्यानंतर विधानपरिषदेत सेनेचे आमदार रवींद्र फाटक आणि प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) मुंबई या संस्थेमार्फत पूलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) सन २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे. या लेखा परीक्षण अहवालानुसार या पुलाचे दुरुस्तीचे कामास गट ‘क’ अंतर्गत रुपये ३ कोटी ५० लक्ष इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून सद्यस्थितीत पुलाच्या पायाच्या व स्तंभाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीत असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महेंद्र किणी यांनी लोकमतला दिली.या पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पाहणी पुनश्च अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे व व्हीजेटीआय मुंबई संस्थेच्या प्राध्यापकांनी दिनांक २० एप्रिलला २०१९ रोजी प्रत्यक्ष केली आहे. व्हीजेटीआय संस्थेमार्फत प्राप्त पाहणी अहवालानुसार (पुलाच्या स्तंभाचे काम दुरुस्ती करून) पुलाच्या वरील भागाचे (सुपरस्ट्रक्चर)चे नव्याने बांधकाम करणे आवश्यक असून सुपरस्ट्रक्चरच्या नव्याने बांधकामासाठी साधारणपणे ३ कोटी रुपये एवढा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती तारांकित प्रश्नाला उत्तर देताना देण्यात आली आहे.हे काम येत्या जून २०१९ च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरकडून प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे वृत्त पसरविणे चुकीचे असून व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ समितीने पाहणी करून हा पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचा अहवाल दिला आहे.प्रवासी संघटनेची मागणीसप्टेंबर महिन्यात या पुलाच्या बांधकामातील शिगा बाहेर येत अनेक ठिकाणी तडे गेल्याने पुलाला भासणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करु न पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे, अशी विनंती वजा मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :palgharपालघरroad safetyरस्ते सुरक्षा