शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

Maharashtra Lockdown : विरारला रेशनसाठी लांबच लांब रांग!, लॉकडाऊनची नागरिकांमध्ये पुन्हा धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 23:58 IST

Maharashtra Lockdown : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

विरार : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक ‘लॉकडाऊन’चे संकेत दिले असल्याने नागरिकांची धास्ती वाढली आहे. याचा परिणाम म्हणून विरारमधील रेशन दुकानांवर सोमवारी सकाळपासून टोकन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. येत्या दोन दिवसांत असा निर्णय झाल्यास अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन वसई-विरारमधील कार्डधारकांनी सकाळपासूनच रेशनिंग दुकानांवर टोकनसाठी रांग लावली होती. विरार-मनवेलपाडा येथील रेशन दुकानावर शेकडो लोकांनी रांग लावल्याने ही रांग एक किलोमीटरपर्यंत गेली होती. अचानक कार्डधारकांनी गर्दी केल्याने रेशन दुकानदारांचीही तारांबळ उडाली. त्यामुळे या दुकानदारांकडूनही तत्काळ टोकन वाटप करण्यात आले. टोकन वाटप झालेल्या कार्डधारकांना उद्यापासून धान्यवाटप करण्यात येणार असून; ३०० टोकनधारकांना एका दिवसात धान्यवाटप करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती रेशन दुकानदारांकडून देण्यात आली. एका रेशन दुकानावर अंदाजे २५०० कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना तांदूळ व गहू वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन निर्णयाअगोदर पुढील दोन दिवसांत कार्डधारकांना धान्यवाटप करताना दुकानदारांचीही कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांना सर्वाधिक पोटापाण्याचा प्रश्न भेडसावला होता. हातावर पोट असलेल्या अनेकांची गुजराण या दिवसांत रेशनच्या धान्यावरच झाली होती, मात्र रेशनवरील धान्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती; वसई-विरारमध्ये तर पहाटेपासून लोक रेशनच्या रांगेत दिसत होते. 

आम्ही योग्य नियोजन करीत आहोत. लोकांना समजावूनही लोक उगाच गर्दी करत आहेत. एका वेळी ३०० कार्डधारकांना टोकन दिले जात आहेत. उद्या सकाळपासून त्यांना धान्य वाटप केले जाईल. - रेशन दुकानदार, मनवेलपाडा 

वीकेंड लॉकडाऊनमुळे दोन दिवस दुकान बंद होते. त्यामुळे लोकांनी अचानक गर्दी केली. टोकन देण्यास संबंधित दुकानदारांना सांगितले आहे. ३० एप्रिलपर्यंत रेशन दुकाने सुरूच राहणार आहेत.      - रोशन कापसे, पुरवठा अधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस