शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Maharashtra Election 2019: वसईत शहरी, ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:24 IST

Maharashtra Election 2019: मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला.

वसई : मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला. दोन-दोन तासांनी तसेच दुपारनंतर वसईच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदार बाहेर पडू लागल्याने मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढत गेली.येथे प्रामुख्याने बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि शिवसेनेचे विजय पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.

सकाळच्या वेळी चुळणे भागात ९.३० च्या सुमारास साधारण तासभर तरी वीज खंडित होण्याचा प्रकार घडला होता, मात्र नंतरच्या काळात कुठेही मतदानकेंद्रावर तांत्रिक अथवा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बोगस मतदान किंवा तुरळक मारामारी असे प्रकार वसई आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले नसून सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे वसई आणि माणिकपूर पोलीस निरीक्षक पुकळे आणि राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ५८ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती वसई विधानसभेचे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किरण सुरवसे यांनी लोकमतला दिली. सकाळी पहिल्या टप्प्यात दोन तासात ८.३३ टक्के मतदान झाले. तर दुपारी १ वाजेपर्यंत हाच आकडा ३६.५१ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर टक्केवारी वाढत गेली आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान