शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019: महिलांकडे नेतृत्व देण्यास पक्षांची अनास्था; ३३ टक्के आरक्षणासाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 23:54 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणी आणि महिला विकासाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून ओळखले जाते.

पालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील सहापैकी डहाणू, विक्रमगड, वसई आणि नालासोपारा या चार विधानसभा मतदार संघातील महिला उमेदवारांवर भरलेले अर्ज मागे घेण्याची वेळ ओढवली. यामुळे विधानसभेवर महिला उमेदवारांना पाठविण्यात राजकीय पक्षांतील पुरु षांचे वर्चस्व आड येत असल्याने महिला वर्गातल्या नाराजीची दबकी चर्चा जिल्ह्यात आहे.महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणी आणि महिला विकासाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेसाठी तेहतीस टक्के आरक्षण मिळवण्यासाठी महिलांना झगडावे लागत आहे. २०१९ ची लोकसभा आणि २१ आॅक्टोबर रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांना विशेष रस नसल्याचे दिसून आले आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्र मगड, पालघर, बोईसर, वसई आणि नालासोपारा या मतदारसंघापैकी सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी डहाणू विधानसभा मतदार संघातील सेनेच्या माजी जि.प. सदस्य वैदही वाढाण, विक्रमगडहून सुरेखा थेतले आणि वसई तसेच नालासोपारा मतदारसंघातून माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी अर्ज मागे घेतला.विक्र मगड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा सुरेखा थेतले यांना होती. मात्र यासाठी माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांना भाजपमधून झुकते माप दिल्याच्या नाराजीतून थेतले यांनी अपक्ष लढण्याच्या इराद्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी अर्ज मागे घेण्याच्या आधी सर्व बंड थंड केले जातील असा इशारा दिल्याने अर्ज माघार घेण्याच्या आदल्या दिवशी सुरेखा थेतले यांसह अन्य दोन बंडखोर उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावून घेत अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तीनही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.थेतले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून स्वत:चे नेतृत्वगुण सिद्ध करताना जिल्हापरिषदेच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महिला सक्षमीकरणासह अनेक सकारात्मक निर्णय घेत आपली छाप पाडली होती. सेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या वैदेही वाढाण या सध्या जिल्हा उपमहिला संघटक असून पालघर, डहाणू विधानसभा मतदार संघातील गाव-पाड्यात निष्ठेने काम करून महिलांची फळी उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पालघर अथवा डहाणू मतदारसंघात त्या उमेदवारीसाठी त्या इच्छुक होत्या. डहाणू विधानसभेत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश पक्ष श्रेष्टींनी दिल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यांनाही अर्ज मागे घेण्यात सांगण्यात आल्याने त्या नाउमेद झाल्या आहेत. तर वसई व नालासोपारा या शहरी मतदार संघातून माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.नेतृत्व गुण असूनही संधी नाहीया तीनही महिला उमेदवारांची आतापर्यंतची यशस्वी राजकीय कारकीर्द आणि जनमानसातील प्रभाव पाहता या जिल्ह्यातून विधानसभेवर जाणारे खमके नेतृत्वगुण त्यांच्यात होते.मात्र राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना लोकसभा आणि विधानसभेवर पाठविण्यात पक्षात वर्चस्व असलेल्या पुरूषांना स्वारस्य नसल्याचे दिसते.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत, जिल्ह्यातीलमहिलांचा विचार होईल का? याचीवाट पहावी लागणार आहे.अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत असताना दोन वर्षांपासून डहाणू - पालघर मतदार संघात पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करते. महिला मतदारातून मला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी होत असल्याने अर्ज भरला. तो वरिष्ठांच्या आदेशाने मागे घेतला.- वैदेही वाढाण,शिवसेना, जिल्हा उपसंघटक.

टॅग्स :palghar-acपालघरvikramgad-acविक्रमगडdahanu-acडहाणूvasai-acवसईnalasopara-acनालासोपारा