शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 21:25 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार भागात झालेल्या घटनेनंतर हितेंद्र ठाकूर हे नाव चर्चेत आले आहे. वसई-विरार भागात 'आप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची कारकीर्द फारच 'वाद'ळी आणि वादग्रस्त राहिली आहे. 

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:नालासोपारा विरार भागात आज मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर येथे आले. त्यांनीही सुरुवातीला तावडे आणि भाजपावर तोंडसुख घेतलं, पण थोड्याच वेळात हे पिता - पुत्र तावडेंसोबत पत्रकार परिषद घेताना दिसले. इतकेच कशाला, विनोद तावडे यांना नंतर ते आपल्याच कारमधून घेऊन जातानाही दिसले. त्याने सगळेच अवाक् झाले.

या घटनेनंतर हितेंद्र ठाकूर हे नाव चर्चेत आले आहे. वसई-विरार भागात 'आप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची कारकीर्द फारच 'वाद'ळी आणि वादग्रस्त राहिली आहे. 

वसई - विरारचे 'भाई' ठाकूर 

मुंबईत ज्या काळात गँगवॉर होत होती, तेव्हा वसई-विरार भागात भाई ठाकूर या नावाची दहशत होती. त्यांच्या विरोधात एक शब्द काढायची कुणाचीच हिंमत नव्हती. पुढे एका हत्या प्रकरणात भाई ठाकूर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर टाडा अंतर्गत खटला चालवण्यात आला. खटला पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. दरम्यानच्या काळात, मुंबईतील टोळ्यांचा खात्मा झाला, वसई विरार मधील वातावरणही बदललं.

भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांनी वेगळी वाट धरत ते राजकारणात सक्रीय झाले. आणि पुढे राजकारणाच्या माध्यमातून आपला प्रभाव वसई-विरार भागावर कायम ठेवला. 

हितेंद्र ठाकूर यांचे राजकारण

हितेंद्र ठाकूर महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असून ते १९८८ सालापासून राजकारणात आहेत. हितेंद्र ठाकूर १९८८ मध्ये वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दोन वर्षांनंतर १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वयाच्या २९ व्या वर्षी काँग्रेसमधून वसई-विरारसाठी आमदार म्हणून निवडून आले. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी वसई विकास मंडळ नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला, जो बहुजन विकासात आघाडीत परिवर्तित झाला. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या. बहुजन विकास आघाडीकडे वसई विरार महानगरपालिका, वसई तालुका पंचायत समिती आणि या भागातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुमत आहे. एकेकाळी, शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी हितेंद्र ठाकूर यांची ओळख होती.

वाद...घोटाळा... खटला...

२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्यावर ८ फौजदारी खटले असल्याचे म्हटले आहे. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातही हितेंद्र ठाकूर यांचे नाव पुढे आले  होते. त्यांच्या व्हिवा ग्रुप ऑफ कंपनीजवर ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली छापेमारी केली होती. 

क्षितिज ठाकूर यांचे मारहाण प्रकरण

हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे सध्या आमदार आहेत. आज विरारमध्ये जे घडलं, त्यात तेही प्रकाशझोतात होते. काही वर्षांपूर्वी एका मारहाण प्रकरणात तेही अडचणीत आले होते. 

विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना त्यांनी मारहाण केली होती. वांद्रे-वरळी सी- लिंक येथे क्षितिज ठाकूर यांची कार अडवली होती. कारची वेगमर्यादा अधिक असल्याबद्दल त्यांना ७०० रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण पुढे बरेच वाढले. या प्रकरणी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतानाही प्रेक्षक गॅलरीतून सूर्यवंशी यांनी आक्षेपार्ह हातवारे करत आपल्याला धमकी दिल्याच आरोप क्षितिज ठाकूर यांनी केला होता.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत क्षितिज ठाकूर नालासोपारा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात भाजपाने राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपा महायुतीसोबत हितेंद्र ठाकूर यांचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीत महाविकास आघाडीची मदत मागितली होती.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024nalasopara-acनालासोपाराHitendra Thakurहितेंद्र ठाकूरKshitij thakurक्षितिज ठाकूरVasai Virarवसई विरार