शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी; दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:59 IST

जिल्हा बँकेचा पुढाकार; बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी

- सुरेश लोखंडे ठाणे : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना १६८ कोटी ५९ लाख १४ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार असून यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने शेतकºयांची पडताळणी करण्यात येत आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांतील चार सेवा सोसायट्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रमाणीकरणाच्या पडताळणीचा प्रारंभ झाला.या आॅनलाइन पडताळणीसाठी शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून बँकेने ठाणे व पालघर दोन्ही जिल्ह्यात बायोमॅट्रिक यंत्रणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने उपलब्ध करून दिली आहे. शेतकºयाचे आधारकार्ड, अंगठ्याचा ठसा घेऊन बँक खाते पडताळणी केली जात आहे. त्यानंतर मिळणारा एक कोडनंबर आॅनलाइन नोंद केल्यानंतर शेतकºयास किती रकमेचे कर्ज माफ झाले. ती रक्कम त्त्वरीत दिसेल.ती मान्य असल्यास शेतकºयाने एस म्हणावे, मान्य नसल्यास नो म्हणायचे. नो म्हटल्यानंतर त्त्वरीत ती तक्रार जिल्हा कमिटीकडे नोंद होऊन त्याच दिवशी कमिटी निर्णय घेऊन शेतकºयास न्याय देणार असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व सीईओ राजेंद्र दोंदे यांनी लोकमतला सांगितले.16,331 ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होती. त्यांची ९६ कोटी ६० लाखांची कर्जमाफी होणार असल्याचे असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.चार ठिकाणांहून प्रारंभशेतकºयांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने कामकाज सोमवारी सुरू झाले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील आंबरापूर सेवा सोसायटी तर मोखाडा येथील असेगाव सेवा सोसायटी या दोन ठिकाणी आणि ठाणेच्या शहापूरमधील धसई आणि अस्रोली येथील सेवा सोसायटीमध्ये प्रथम प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकºयांच्या याद्या आल्या आहेत.येथे लावणार पात्र शेतकºयांच्या याद्याअसनोली येथील १९२ तर धसई येथील ४९ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रृटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या नावाच्यायाद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार आहे.पालघरमधील १२ हजार शेतकरीपालघर जिल्ह्यातील १२ हजार ५८४ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले असून त्यांना ७४ कोटी एक लाख ८४ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. यात ६१ कोटी १५ लाख ८७ हजार रुपयांची मुद्दल व त्यावरील व्याज १२ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपये आहे. मुद्दल व व्याज मिळून पालघर जिल्हह्यातील या पात्र शेतकºयांचे ७४ कोटी एक लाख ८४ हजारांचे कर्जमाफ होईल. यामध्ये सर्वाधिक वाडा तालुक्यातील तीन हजार ६८८ शेतकºयांचे २४ कोटी ६७ लाखांचे कर्ज माफ होईल. तर याखालोखाल पालघर तालुक्यातील एक हजार ९७१ शेतकºयांचे ११ कोटी ७६ लाख ६२ हजार, डाहाणूमधील एक हजार ७०० शेतकºयांचे नऊ कोटी ७३ लाख ४० हजार, वसईचे २३१ शेतकºयांचे एक कोटी ७५ लाख ९६ हजार, तलासरीचे एक हजार ४७ शेतकºयांचे सात कोटी ७३ लाख ७५ हजार, मोखाडामधील एक हजार ७८६ जणांचेसहा कोटी एक लाख पाच हजार, जव्हारमधील एक हजार ५३ शेतकºयाचे चार कोटी ७८ लाख ८६ हजार, विक्रमगडमधील एक हजार १०६ शेतकºयांचे सात कोटी ५५ लाख १४ हजारांचे कर्जमाफ होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी