शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी; दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:59 IST

जिल्हा बँकेचा पुढाकार; बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी

- सुरेश लोखंडे ठाणे : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना १६८ कोटी ५९ लाख १४ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार असून यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने शेतकºयांची पडताळणी करण्यात येत आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांतील चार सेवा सोसायट्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रमाणीकरणाच्या पडताळणीचा प्रारंभ झाला.या आॅनलाइन पडताळणीसाठी शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून बँकेने ठाणे व पालघर दोन्ही जिल्ह्यात बायोमॅट्रिक यंत्रणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने उपलब्ध करून दिली आहे. शेतकºयाचे आधारकार्ड, अंगठ्याचा ठसा घेऊन बँक खाते पडताळणी केली जात आहे. त्यानंतर मिळणारा एक कोडनंबर आॅनलाइन नोंद केल्यानंतर शेतकºयास किती रकमेचे कर्ज माफ झाले. ती रक्कम त्त्वरीत दिसेल.ती मान्य असल्यास शेतकºयाने एस म्हणावे, मान्य नसल्यास नो म्हणायचे. नो म्हटल्यानंतर त्त्वरीत ती तक्रार जिल्हा कमिटीकडे नोंद होऊन त्याच दिवशी कमिटी निर्णय घेऊन शेतकºयास न्याय देणार असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व सीईओ राजेंद्र दोंदे यांनी लोकमतला सांगितले.16,331 ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होती. त्यांची ९६ कोटी ६० लाखांची कर्जमाफी होणार असल्याचे असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.चार ठिकाणांहून प्रारंभशेतकºयांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने कामकाज सोमवारी सुरू झाले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील आंबरापूर सेवा सोसायटी तर मोखाडा येथील असेगाव सेवा सोसायटी या दोन ठिकाणी आणि ठाणेच्या शहापूरमधील धसई आणि अस्रोली येथील सेवा सोसायटीमध्ये प्रथम प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकºयांच्या याद्या आल्या आहेत.येथे लावणार पात्र शेतकºयांच्या याद्याअसनोली येथील १९२ तर धसई येथील ४९ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रृटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या नावाच्यायाद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार आहे.पालघरमधील १२ हजार शेतकरीपालघर जिल्ह्यातील १२ हजार ५८४ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले असून त्यांना ७४ कोटी एक लाख ८४ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. यात ६१ कोटी १५ लाख ८७ हजार रुपयांची मुद्दल व त्यावरील व्याज १२ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपये आहे. मुद्दल व व्याज मिळून पालघर जिल्हह्यातील या पात्र शेतकºयांचे ७४ कोटी एक लाख ८४ हजारांचे कर्जमाफ होईल. यामध्ये सर्वाधिक वाडा तालुक्यातील तीन हजार ६८८ शेतकºयांचे २४ कोटी ६७ लाखांचे कर्ज माफ होईल. तर याखालोखाल पालघर तालुक्यातील एक हजार ९७१ शेतकºयांचे ११ कोटी ७६ लाख ६२ हजार, डाहाणूमधील एक हजार ७०० शेतकºयांचे नऊ कोटी ७३ लाख ४० हजार, वसईचे २३१ शेतकºयांचे एक कोटी ७५ लाख ९६ हजार, तलासरीचे एक हजार ४७ शेतकºयांचे सात कोटी ७३ लाख ७५ हजार, मोखाडामधील एक हजार ७८६ जणांचेसहा कोटी एक लाख पाच हजार, जव्हारमधील एक हजार ५३ शेतकºयाचे चार कोटी ७८ लाख ८६ हजार, विक्रमगडमधील एक हजार १०६ शेतकºयांचे सात कोटी ५५ लाख १४ हजारांचे कर्जमाफ होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी