शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

२८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी; दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:59 IST

जिल्हा बँकेचा पुढाकार; बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी

- सुरेश लोखंडे ठाणे : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना १६८ कोटी ५९ लाख १४ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार असून यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने शेतकºयांची पडताळणी करण्यात येत आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांतील चार सेवा सोसायट्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रमाणीकरणाच्या पडताळणीचा प्रारंभ झाला.या आॅनलाइन पडताळणीसाठी शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून बँकेने ठाणे व पालघर दोन्ही जिल्ह्यात बायोमॅट्रिक यंत्रणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने उपलब्ध करून दिली आहे. शेतकºयाचे आधारकार्ड, अंगठ्याचा ठसा घेऊन बँक खाते पडताळणी केली जात आहे. त्यानंतर मिळणारा एक कोडनंबर आॅनलाइन नोंद केल्यानंतर शेतकºयास किती रकमेचे कर्ज माफ झाले. ती रक्कम त्त्वरीत दिसेल.ती मान्य असल्यास शेतकºयाने एस म्हणावे, मान्य नसल्यास नो म्हणायचे. नो म्हटल्यानंतर त्त्वरीत ती तक्रार जिल्हा कमिटीकडे नोंद होऊन त्याच दिवशी कमिटी निर्णय घेऊन शेतकºयास न्याय देणार असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व सीईओ राजेंद्र दोंदे यांनी लोकमतला सांगितले.16,331 ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होती. त्यांची ९६ कोटी ६० लाखांची कर्जमाफी होणार असल्याचे असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.चार ठिकाणांहून प्रारंभशेतकºयांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने कामकाज सोमवारी सुरू झाले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील आंबरापूर सेवा सोसायटी तर मोखाडा येथील असेगाव सेवा सोसायटी या दोन ठिकाणी आणि ठाणेच्या शहापूरमधील धसई आणि अस्रोली येथील सेवा सोसायटीमध्ये प्रथम प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकºयांच्या याद्या आल्या आहेत.येथे लावणार पात्र शेतकºयांच्या याद्याअसनोली येथील १९२ तर धसई येथील ४९ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रृटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या नावाच्यायाद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार आहे.पालघरमधील १२ हजार शेतकरीपालघर जिल्ह्यातील १२ हजार ५८४ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले असून त्यांना ७४ कोटी एक लाख ८४ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. यात ६१ कोटी १५ लाख ८७ हजार रुपयांची मुद्दल व त्यावरील व्याज १२ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपये आहे. मुद्दल व व्याज मिळून पालघर जिल्हह्यातील या पात्र शेतकºयांचे ७४ कोटी एक लाख ८४ हजारांचे कर्जमाफ होईल. यामध्ये सर्वाधिक वाडा तालुक्यातील तीन हजार ६८८ शेतकºयांचे २४ कोटी ६७ लाखांचे कर्ज माफ होईल. तर याखालोखाल पालघर तालुक्यातील एक हजार ९७१ शेतकºयांचे ११ कोटी ७६ लाख ६२ हजार, डाहाणूमधील एक हजार ७०० शेतकºयांचे नऊ कोटी ७३ लाख ४० हजार, वसईचे २३१ शेतकºयांचे एक कोटी ७५ लाख ९६ हजार, तलासरीचे एक हजार ४७ शेतकºयांचे सात कोटी ७३ लाख ७५ हजार, मोखाडामधील एक हजार ७८६ जणांचेसहा कोटी एक लाख पाच हजार, जव्हारमधील एक हजार ५३ शेतकºयाचे चार कोटी ७८ लाख ८६ हजार, विक्रमगडमधील एक हजार १०६ शेतकºयांचे सात कोटी ५५ लाख १४ हजारांचे कर्जमाफ होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी