शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

खलाशांचे जीवन रक्षक : ज्येष्ठ मच्छीमाराचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:34 IST

समुद्रात अडचणीत सापडलेल्या

भारतीय तटरक्षक दलातर्फे १७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित मेरीटाईम सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू बोर्डाच्या सभेत ‘जीवन रक्षक पुरस्कारा’ने डहाणू तालुक्यातील ७१ वर्षीय ज्येष्ठ मच्छिमार नेते अशोक अंभिरे यांना गौरविण्यात आले. त्यांना या व्यवसायाचा ४५ वर्षांचा अनुभव असून गुंगवाडा मच्छिमार सहकारी सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न: आपणास हा पुरस्कार कोणत्या कार्याबद्दल देण्यात आला?गतवर्षी धाकटी डहाणू येथील भानुदास तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट खोल समुद्रात बुडत असताना त्यातील ११ खलाशांचे प्राण वाचविण्यात यश आले. एवढ्यावरच न थांबता बुडत्या बोटीला किनाऱ्यापर्यंत घेऊन येण्याचे दिव्य अन्य मच्छिमार बोटींच्या मदतीने केले. खोल समुद्रात प्रसंगावधान राखून ११ जणांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुखरूप किनाºयापर्यंत घेऊन आल्याच्या कार्याची दखल घेऊन भारतीय तटरक्षक दलातर्फेहा पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला.

प्रश्न : बुडत्या बोटीवरील खलाशांना वाचवण्याच्या प्रसंगाचे वर्णन सांगू शकता?१८ आॅगस्ट रोजी दुपारी आमची पवनसाई आणि भाग्यलक्ष्मी या दोन बोटी मासेमारीकरिता गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास खोल समुद्रात भाग्यलक्ष्मी ही बोट दुर्घटनाग्रस्त होऊन बुडत असल्याचा वायरलेश प्राप्त झाला आणि संपर्क तुटला. मात्र तत्पूर्वी मी आणि माझा मुलगा आनंद आम्ही अपघातग्रस्त बोटीच्या मालकाला आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याच्या सूचना आणि धीर देत मदतीसाठी निघत असल्याचे सांगितले. क्षणाचाही विलंब न करता प्रवास सुरू केला. मात्र थोड्या वेळातच मालवाहू जहाज समोर आल्याने त्याला वळसा घालून जावे लागल्याने साधारणत: नऊच्या सुमारास घटनास्थळी पोहचलो. तत्काळ आमच्या बोटीवरील एकूण आठ जणांनी अकरा खलाशांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अकरापैकी चौघांना पोहता येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना आमच्या बोटीवर घेण्यात यश आले.प्रश्न : त्यानंतर किनाºयापर्यंतचा प्रवास कसा होता?मासेमारी हंगामाच्या पहिल्या टप्यातील ही पहिलीच फिशिंग असल्याने दुर्घटनाग्रस्त बोट तेथेच सोडून येणे आम्हाला पटले नाही. यापूर्वी चार वेळा खोल समुद्रात अपघातग्रस्त बोटींना वाचवून त्यांना किनाºयावर आणण्याचा अनुभव गाठीशी होता. मात्र पावसाळा आणि जोराचा वाºयामुळे अजस्त्र लाटा उसळत असल्याने हा बाका प्रसंग होता. आमच्या बोटीला अपघातग्रस बोट बांधताना दिव्यच करावे लागले. या बचाव कार्यात सुमारे ५० हजारांचे दोरखंड तुटले. रात्रीच्या अंधारामुळे सूर्य उगवण्याची वाटबघत अनेक तास घालवले. त्या काळात नियोजन आणि अन्य मच्छिमार बोटींची मदत घेतली. साधारणत: ताशी ८ ते १० नॉटिकल वेगाने मासेमारी बोट प्रवास करते. येथे केवळ अर्धा नॉटिकल पुढे सरकता येत होते. अखेर २० आॅगस्टला किनारा गाठण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आमच्या स्वागताकरिता संपूर्ण कोळी बांधव आले होते.चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादपावसाळा आणि जोराचा वाºयामुळे अजस्त्र लाटा उसळत असल्याने बाका प्रसंग होता. आमच्या बोटीला अपघातग्रस बोट बांधताना दिव्यच करावे लागले. 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराfishermanमच्छीमार