शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खलाशांचे जीवन रक्षक : ज्येष्ठ मच्छीमाराचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:34 IST

समुद्रात अडचणीत सापडलेल्या

भारतीय तटरक्षक दलातर्फे १७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित मेरीटाईम सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू बोर्डाच्या सभेत ‘जीवन रक्षक पुरस्कारा’ने डहाणू तालुक्यातील ७१ वर्षीय ज्येष्ठ मच्छिमार नेते अशोक अंभिरे यांना गौरविण्यात आले. त्यांना या व्यवसायाचा ४५ वर्षांचा अनुभव असून गुंगवाडा मच्छिमार सहकारी सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न: आपणास हा पुरस्कार कोणत्या कार्याबद्दल देण्यात आला?गतवर्षी धाकटी डहाणू येथील भानुदास तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट खोल समुद्रात बुडत असताना त्यातील ११ खलाशांचे प्राण वाचविण्यात यश आले. एवढ्यावरच न थांबता बुडत्या बोटीला किनाऱ्यापर्यंत घेऊन येण्याचे दिव्य अन्य मच्छिमार बोटींच्या मदतीने केले. खोल समुद्रात प्रसंगावधान राखून ११ जणांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुखरूप किनाºयापर्यंत घेऊन आल्याच्या कार्याची दखल घेऊन भारतीय तटरक्षक दलातर्फेहा पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला.

प्रश्न : बुडत्या बोटीवरील खलाशांना वाचवण्याच्या प्रसंगाचे वर्णन सांगू शकता?१८ आॅगस्ट रोजी दुपारी आमची पवनसाई आणि भाग्यलक्ष्मी या दोन बोटी मासेमारीकरिता गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास खोल समुद्रात भाग्यलक्ष्मी ही बोट दुर्घटनाग्रस्त होऊन बुडत असल्याचा वायरलेश प्राप्त झाला आणि संपर्क तुटला. मात्र तत्पूर्वी मी आणि माझा मुलगा आनंद आम्ही अपघातग्रस्त बोटीच्या मालकाला आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याच्या सूचना आणि धीर देत मदतीसाठी निघत असल्याचे सांगितले. क्षणाचाही विलंब न करता प्रवास सुरू केला. मात्र थोड्या वेळातच मालवाहू जहाज समोर आल्याने त्याला वळसा घालून जावे लागल्याने साधारणत: नऊच्या सुमारास घटनास्थळी पोहचलो. तत्काळ आमच्या बोटीवरील एकूण आठ जणांनी अकरा खलाशांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अकरापैकी चौघांना पोहता येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना आमच्या बोटीवर घेण्यात यश आले.प्रश्न : त्यानंतर किनाºयापर्यंतचा प्रवास कसा होता?मासेमारी हंगामाच्या पहिल्या टप्यातील ही पहिलीच फिशिंग असल्याने दुर्घटनाग्रस्त बोट तेथेच सोडून येणे आम्हाला पटले नाही. यापूर्वी चार वेळा खोल समुद्रात अपघातग्रस्त बोटींना वाचवून त्यांना किनाºयावर आणण्याचा अनुभव गाठीशी होता. मात्र पावसाळा आणि जोराचा वाºयामुळे अजस्त्र लाटा उसळत असल्याने हा बाका प्रसंग होता. आमच्या बोटीला अपघातग्रस बोट बांधताना दिव्यच करावे लागले. या बचाव कार्यात सुमारे ५० हजारांचे दोरखंड तुटले. रात्रीच्या अंधारामुळे सूर्य उगवण्याची वाटबघत अनेक तास घालवले. त्या काळात नियोजन आणि अन्य मच्छिमार बोटींची मदत घेतली. साधारणत: ताशी ८ ते १० नॉटिकल वेगाने मासेमारी बोट प्रवास करते. येथे केवळ अर्धा नॉटिकल पुढे सरकता येत होते. अखेर २० आॅगस्टला किनारा गाठण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आमच्या स्वागताकरिता संपूर्ण कोळी बांधव आले होते.चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादपावसाळा आणि जोराचा वाºयामुळे अजस्त्र लाटा उसळत असल्याने बाका प्रसंग होता. आमच्या बोटीला अपघातग्रस बोट बांधताना दिव्यच करावे लागले. 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराfishermanमच्छीमार