शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय करायचा तर आता परवाना होणार बंधनकारक    

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 23:55 IST

Vasai-Virar Municipal Corporation : पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे.

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गत ज्या दुकानदारांना, व्यावसायिकांना व्यवसाय करायचा असेल तर मनपाचा ना हरकत परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. किमान दीड हजारांपासून हा व्यवसाय कर मनपा आकारणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून हे परवाने देण्यास सुरुवात केेली जाणार असल्याने पालिकेच्या तिजोरीत दरवर्षाला ७० ते ७५ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे. वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. मात्र तेव्हापासून शहरातील व्यावसायिक आणि दुकानदार पालिकेला कर न देता व्यवसाय करत होते. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने विविध स्रोतांचा अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी दुकानदारांकडून मालमत्ता कर वगळता कुठलाही कर आकारला जात नसल्याचे लक्षात आले. यामुळे पालिकेने सर्व दुकानदारांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यवसाय परवाना काढावा लागणार आहे. ज्यांची कायमस्वरूपी दुकाने आहेत, त्यांना व्यवसाय परवाना काढावा लागणार आहेच. शिवाय जे तात्पुरता व्यवसाय करतील त्यांनाही परवाना काढावा लागणार आहे. शहरात चित्रीकरण केले जाते. तसेच सर्कस, मेळावे, व्यापारपेठेचे आयोजन केले जाते. या सर्वांना हा परवाना बंधनकारक होणार आहे. चित्रीकरणाला कर लागू झाल्याने पालिकेला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 

कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर ना हरकत परवाना घ्यावा लागतो. पण वसई-विरार महानगरपालिकेत याकडे दुर्लक्ष केले होते. नियमांप्रमाणे ना हरकत दाखल्याला लागणारी फी आकारली जाणार आहे. परवाना नूतनीकरणासाठी फी आकारली जाणार आहे. महानगरपालिकेकडे ना हरकत परवान्यामुळे दरवर्षी ७० ते ७५ कोटींची रेव्हेन्यूमध्ये भर पडणार आहे.- प्रदीप जांभळे-पाटील,     उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका

लोकांच्या सुविधेसाठी सोपी पद्धतपरवाना मिळावा म्हणून चालू वर्षाची घरपट्टी, दुकानाचे ॲग्रिमेंट, भाडेकरार, ओळखपत्राच्या साहाय्याने फॉर्म स्वतः कार्यालयात जाऊन भरु शकतात किंवा ऑनलाइन व महानगरपालिकेच्या वेबसाइटवरसुद्धा परवान्यासाठी अर्ज करू शकता. छोट्या दुकानदारांना, उद्योगधंद्यांना महानगरपालिकेचा परवाना मिळावा यासाठी सोपी पद्धत ठेवण्यात आली असल्याचे मनपा उपायुक्तांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

अंमलबजावणीला सुरुवातnमहानगरपालिका क्षेत्रातील दुकानदार आणि व्यावसायिकांकडून लगेचच परवाना शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७६, ३७६ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्याच्या कामाला नऊ प्रभागात सुरुवात केली आहे. nजागोजागी बॅनर, वर्तमानपत्रात जाहिराती, वेबसाइटवर ना हरकत दाखल्यासंबंधी महानगरपालिकेकडून आव्हान केले जात आहे. १५ दिवसांत ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करावा लागेल. जे याकडे कानाडोळा करून व्यवसाय सुरू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दुकानांना सील केले जाईल.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार