शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालघर लोकसभेतील विधानसभेची गणिते बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:11 IST

भाजप -शिवसेना युती झाल्याने विधानसभेसाठी इच्छुकांची होणार गोची : विरोधकांची एकमेकांच्या बालेकिल्ल्यांत आघाडी

राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत महायुतीचे राजेंद्र गावीत यांनी बाजी मारली येथील सहा मतदार संघापैकी पालघर बोईसर आणि नालासोपारा या विधानसभेत सेना तर विक्र मगड डहाणू आणि वसई मध्ये महाआघाडीने आघाडी घेतली मात्र गावीत यांनी घेतलेली आघाडी जाधव यांना तोडता आली नाही यातूनच पालघरात महायुतीचा झेंडा फडकला मात्र युतीचा गड समजल्या जाणाऱ्या विक्र मगड विधानसभेत आघाडीने मिळविलेली मते लक्षणीय असून या ठिकाणी युतीला ७३ हजार १७६ तर आघाडीला ७८ हजार ८८१ मते मिळाली यानुसार ५ हजार ७०५ मतांची आघाडी मिळाली त्यामुळे बविआच्या बाल्लेकील्यांत युतीने तर युतीच्या बालेकिल्ल्यांत बविआने आघाडी घेतल्याचे विधानसभेची गतवर्र्षीप्रमाणे चालत असलेली राजकीय परिस्थिती या लोकसभा निवडणुकीत बदलेली दिसली. तर भाजपा-सेना यापुर्वी आमने सामने असतांना विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची गोची होणार आहे. यामुळे मात्र येणारी विधानसभेची लढाई अधिक रंगतदार होईल हे नक्की. पालघर लोकसभा मतदार संघातील विक्रमगड विधानसभा हा पूर्वापार पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. आजच्या घडीला राज्याचे आदीवासी विकासमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा याचा मतदारसंघ आहे तसेच विक्रमगड आणि जव्हार पंचायत समिती भाजपकडे असून मोखाडा पंचायत समितीही शिवसेनेकडे आहे तर मोखाडा नगरपंचायत आणि जव्हार नगरपरिषदेवर सेनेचीच सत्ता आहे असा सगळा भाजप शिवसेनेचा बोलबाला याठीकाणी आहे शिवाय पोटनिवडणुकीत सेना आणि भाजपाची मिळून लाखाहून अधिक मतांची बेरीज गेली होती यामुळे या लोकसभेतही याठिकाणी युतीच पुढे राहील असा राजकीय अंदाज होता मात्र बविआ सीपीएम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची झालेली महाआघाडी आणि त्यांनी केलेले काम यामुळे विक्रमगड मध्ये युतीला धोबीपछाड देण्यात आघाडी यशस्वी ठरली. यामुळे आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या असून याठिकाणी विधानसभेत आघाडी विरूध्द युती यांच्यात चुरस पहावयास मिळणार आहे या मतांची कारणमीमांसा अशी की, सुरवातीपासूनच याठीकाणी सेना भाजप मध्ये बेबनाव होता विक्रमगड मधील काही पदाधिकाºयानी सेनेला उमेदवारी देण्यावरून राजीनामे दिले होते.

तर गावीत यांना सेनेने उमेदवारी दिल्याने जव्हार मोखाड्यातही पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज होते यामुळे याठिकाणी सुरवातीला जो बेबनाव युतीमध्ये पहावयास मिळाला त्याला नाहीसा करण्यात थोडेफार यश मिळाले असले तरी ते यश पदाधिकाऱ्यांपर्यंतच सिमित राहीले तर दुसरीकडे महाआघाडीच्या सर्व पक्षांची दिलजमाई व्यवस्थित झाली. याशिवाय दिवसरात्र एक करून प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवली यासर्वात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांचा अग्रक्रम राहीला. तर सीपीएमनेही आपली पूर्ण ताकद बविआच्या पाठीशी उभी केली होती. त्यातूनच याठिकाणी आघाडीची सरशी झाली यामुळे जिथे बविआचे पारंपारिक बालेकिल्ले ढासळले, त्या बविआची सेनेच्या गडात गाडी सुसाट निघाली तिथे युतीच्या गडाला सुरुंग लावण्याचे काम आघाडीने केले.

सन-२०१५ च्या विधानसभेत शिवसेना-भाजपात झाली होती काँटे की टक्करविक्रमगड विधानसभा मतदार संघात २०१५ मध्ये एकूण १२ उमेदवार उभे होते त्यापेकी शिवसेनेचे प्रकाश निकम,भाजपचे विष्णू सवरा, राष्ट्रवादीचे सुनील भुसारा या तीन उमेदवारांमध्ये अक्षरश: कांटे कि टक्कर होती परंतु जनमताचा कौल भाजपाच्या दिशने झुकला आणि शिवसेना व राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. भाजपाचे विष्णू सवरा यांना ४०२०१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या प्रकाश निकम यांना ३६३५३.मते मिळाली व राष्ट्रवादीचे सुनील भूसारा तिसºया क्र मांकावर गेले त्यांना ३२०५३ मते मिळाली होती. मोदी व भाजपाच्या लाटेचा प्रभाव विक्रमगड विधानसभा मतदारसंघात त्यावेळेस पाहावयास मिळाला.युती तुटल्याने प्रथमच भाजपाने स्वबळावर निवडणूक लढली होती. व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला पुन्हा राखण्यात भाजपाला यश आले होते. मात्र या लोकसभा निवडणूकीत महायुती असतांनाही विक्र मगड विधानसभेत ५ हजार ७०५ मतांची बविआला आघाडी मिळाली याची कारणे तपासली तर ती या विधानसभेतील जव्हार, विक्रमगड, मोखाडा या तिनही तालुक्याला मंत्री मिळूनही पाणी, वीज, शिक्षण, रोजगार, दळणवळणचा मोठा अभाव त्याकडे मंत्रीमहोदयाचे झालेले दुर्लक्ष विकासकामाचा अभाव व नाराजी अशी आहेत.

युतीमुळे विधानसभेच्या इच्छुकांची होणार गोचीविधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा राज्यात सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले.मात्र त्यानंतर राज्यांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सेना-भाजपा स्वतंत्रपणे लढली होती. युतीसाठी कटोरा घेऊन फिरणार नाही.यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, अशा घोषणा करण्यांत आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या अनेक इच्छुकांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी साडेचार वर्षापासून सुरु केली होती. मात्र लोकसभा निवडणुकी पूर्वी अचानक सेना-भाजपाची युती झाली. या युतीने मागील निवडणुकीप्रमाणे चांगले यश मिळवले.त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजपा-सेनेला एकत्र यावे लागणार असल्याने इच्छुकांची गोची होईल.

या ठिकाणी बविआ कॉग्रेस सीपीएम राष्ट्रवादी शेकाप मनसे अशा महाआघाडीतील सर्वच घटक पक्षांनी तना मनाने काम केले आजवर आमची खिल्ली उडवणाºया सेना भाजपाला आमच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. आता खरी लढाई अजून बाकी असून आपण असेच मिळून लोकांची कामे करु यात. प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका मनापासून पार पाडू या. -सुनिल भुसारा, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

विक्रमगड व डाहाणू विधानसभा मतदारसंघ हे भाजपाचे बालेकिल्ले असतांनाही आम्ही तेथे कमी पडलो याला अनेक कारणे आहेत व याबाबतच्या तक्रारीची मुख्यमंत्री, पक्षश्रेष्ठी, प्रदेशाध्यक्ष, तसेच पालघर लोकसभा प्रभारी रविद्र चव्हाण यांनी दखल घेतली असल्याने यापुढे सर्व एकत्र काम करू व विक्र मगड, डहाणूमध्ये भाजपाचेच आमदार असतील. -विजय औसरकर, जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा