शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

वसईच्या शहरी व ग्रामीण भागात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर स्मशान शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 1:13 PM

कोरोना चे सावट वसईच्या शहरी व ग्रामीण भागात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर स्मशान शांतता "गर्दी टाळू...या...कोरोना जीवघेण्या विषाणू' ला  पळवूया; मॉर्निंग वॉक ,जिम,योगा,शतपावली व सकाळीच चिकन -मटण साठी मार्केटल्या जाणाऱ्या वसईकरांनी रविवारी "जनता कर्फ्यु "म्हणून घराबाहेर काय बाल्कनी व खिडकीत येणे सुद्धा टाळलं आहे."! वसई रोड रेल्वे स्टेशन,नवघर ,आनंदनगर,वसई पूर्व,गोखीवरे,वसई पार नाका, वसई गाव ,नायगाव कोळीवाडा,जेट्टी परिसर,मार्केट आदी भागात प्रचंड शुकशुकाट !

- आशिष राणे

वसई : जभभर थैमान घालणाऱ्या कोरोना-2019 या जीवघेण्या विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने लढा देत अंगी संयम बाळगून संकल्प करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता केलेल्या भावनिक आवाहना नुसार "जनता कर्फ्यू" ला रविवारी वसईच्या शहरी व ग्रामीण भागात  सकाळी 7 वाजण्याआधीच शांततेत सुरुवात झाली. 

खरं तर सकाळची वेळ आणि त्यात रविवार तरीही लोकं मॉर्निंग वॉक, व्यायाम,जिम,योगा ,शतपावली व फिरायला जाणे याउलट सकाळीच चिकन व मटण साठी मार्केट गाठणे असा दिनक्रम सुरू होतो, मात्र कोरोना चे सावट व त्यात जनता कर्फ्यु मुळे रविवारी सर्वत्र वसईकरांनी घराबाहेर काय तर आपल्या घराच्या बाल्कनी वा खिडकीत सुद्धा येणं टाळलं आहे.त्यामुळे रविवारी सकाळ पासून च वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अगदी रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर व मार्केट भागात स्मशान शांतता पसरली असल्याचे चित्र दिसत आहे. 

दरम्यान दिवस उजाडताच गल्ली-गल्लीत, चौकात, नाक्यावर विविध रस्त्यावर, बागेत,उद्यानात आणि खास करून पेपर स्टॉल, चहाची टपरी,उपहारगृह व महामार्ग, रेल्वे स्टेशन वर ठिकठिकाणी होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता, एकार्थाने वसई पूर्णच थांबली आहे. त्यामुळे वसई शहरात सकाळी सात वाजण्यापूर्वीच  अघोषित संचारबंदी सुरू झाली होती.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिले आहेत.  त्यामुळे शनिवार पासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे  टाळले. मात्र आदेशानंतरही ज्यांनी अद्योगिक वसाहती, दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास शेवटी पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे आता वसईच्या शहरे आणि ग्रामीण भागात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला. रविवारी सकाळी 7वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही. 

कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये व घरीच थांबावे, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी जनता कर्फ्यूची संकल्पना मांडली होती,आता या संकल्पनेस आपण सर्वांनी घरात राहून संयम बाळगून तिला सत्यात उतरवून शेवटी कोरोना ला पळवुन लावू या ! 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार