शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

भरावाचा फटका भूमीपुत्रांनाच

By admin | Updated: July 7, 2017 05:57 IST

वाढवण बंदराच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम पर्यायात ६ ंहजार ६८६ कोटीच्या खर्चातून समुद्रात अंदाजे ५ हजार एकर

हितेन नाईक/लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वाढवण बंदराच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम पर्यायात ६ ंहजार ६८६ कोटीच्या खर्चातून समुद्रात अंदाजे ५ हजार एकर क्षेत्रात २५.३ लाख टन दगड (डबर) माती, सिमेंट टाकून बनविण्यात येणाऱ्या भरावांचा सर्वात मोठा फटका वरोर, डहाणू, चिंचणीसह थेट सातपाटी-केळवे गावाना बसणार आहे. सध्याच समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील अनेक घरे उध्वस्त करीत आहेत. या महाकाय भरावामुळे समुद्राचे नैसर्गिक क्षेत्र, किनारे व भरतीत बदल होऊन उधाणाचे पाणी गावागावात शिरून मच्छिमार वसाहती नष्ट करण्याचा धोका आहे. वाढवण गावाच्या दक्षिणेला उभे असलेले देशातील सर्वात मोठे तारापूर अणुशक्ती केंद्र, अग्नेय दिशेला तारापूर एमआयडीसीमधून प्रदूषण करणारे हजारो कारखाने, पूर्वेकडे हजारो टन फ्लार्इंग अ‍ॅश उडवणारे रिलायन्स थर्मल पॉवर, उत्तरे कडून गुजरातच्या जीआयडीसीच्या कारखान्यामधून समुद्रात येणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी तर वायव्येला काही सागरीमैलावर असलेले कराची बंदर अशी जीवघेणी परिस्थिती आहे. डहाणू, पालघर तालुक्याचा किनारपट्टीवरील भाग सापडला असतांना विकास आणि तरु णांना रोजगार अशा गोंडस नावाखाली वाढवण बंदर केंद्र आणि राज्य सरकार इथल्या जनतेवर लादू पाहत आहे. डहाणूच्या हरितक्षेत्राच्या संरक्षणसाठी सुप्रीम कोर्टानी निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण संरक्षण प्राधिकरण नेमले होते. त्याने हे बंदर प्रथम सन १९९८ साली रद्द करायला लावले आणि आता पुन्हा ते डोक वरकाढू पहात असतांना त्याला पुन: एकदा स्थगिती दिली. त्यामुळे युतीचे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी कोपिष्ट झाले असून आडकाठी ठरत असलेले हे प्राधिकरणच रद्द करण्याच्या छुप्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सूर करण्यात आल्याचे कळते. म्हणजे काहीही झाले तरी आड येणाऱ्यांना आडवे पाडून आम्ही बंदर उभारणारच असाच काहीसा हट्टी पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचेही समजते. यंदा जून महिन्यापासूनच मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या तुफानी लाटांनी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांना ओलांडून किनाऱ्यावरील घरांचे संसार उध्वस्त केले आहेत. अशावेळी या बंदराची उभारणी झाल्यास मत्स्यउत्पादनाचा गोल्डन बेल्ट नष्ट होणे, कोळशाच्या वाहतूकीने प्रदूषण वाढणे, मोठ्या प्रमाणात दगड लागणार असल्याने परिसरातील डोंगर-टेकड्या नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होणे आणि समुद्र समुद्राचे नैसर्गिक स्त्रोत बदलून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन त्याचा मोठा फटका किनाऱ्यालगतच्या गावांना बसणार आहे. त्याचा विचार मात्र कुणीही करीत नाही?जबरदस्तीने वाढवण बंदर उभारून शासन आम्हा मच्छीमारांचे अस्तित्वच नष्ट करायला निघाले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व मच्छिमार, शेतकरी, डायमेकर यांनी एकजूटीने मोठा लढा उभारायला हवा. - हेमंत तामोरे, चेअरमन, धाकटी डहाणू सहकारी संस्था.बंदराला विरोध असल्याचे वरकरणी दाखवून सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी एनजीओची स्थापना करून जेएनपीटीकडे नोकरीची भीक मागणाऱ्या गद्दाराना उघडे पाडा. -सुनील तांडेल, ग्रामस्थ-दांडीतिघांमधून निवडला कमी खर्चाचा पर्यायवाढवण बंदराच्या उभारणीसाठी तीन पर्याय निवडल्याचे त्यांच्या अहवाला वरून दिसून येत असून पहिल्या पर्यायात ६ हजार ७५७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ९ लाख टन दगडांची आवश्यकता भासणार आहे. तर ३ वर्षे ५ महिन्यांचा कालावधी बंदर उभारणी साठी लागणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.तर दुसऱ्या पर्यायात ६ हजार ६८६ कोटी खर्च व तिसऱ्या पर्यायात एकूण ६ हजार ३१९ कोटींचा खर्च अपेक्षित असून ५ वर्षे ८ महिन्यांचा कालावधी लागून १६.३ लाख टन दगडांची आवश्यकता भासणार आहे. या खर्चात धूपप्रतिबंधक बंधारे, समुद्रातील भराव, उत्खनन या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. सन २०२३ मध्ये पहिल्या वर्षात वाढवणं बंदरातून ०.८ मेट्रिक टन मालाची वाहतूक अपेक्षित असून पुढे २०२५ मध्ये कोळशाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने बंदराचे संकल्पित चित्र दाखविण्यात आले आहे ते पाहता समुद्रातील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात व क्षेत्रात बदल होऊन त्याचे परिणाम या बंदरामुळे प्रभावित होणाऱ्या वरोर, चिंचणी, दांडा पाडा, गुंगवाडा, तिडयाले, धाकटी डहाणू, तारापूर, घिवली, उच्छेळी-दांडी, नवापूर, आलेवाडी, नांदगाव, मुरबे, सातपाटी, वडराई, माहीम, केळवे ई. किनारपट्टीवरील घरे, शेती, बागायतींना भोगावे लागतील.