शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

बुलेट ट्रेनसाठी वसईतील जमीन मोजणी अखेर पूर्ण, शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:46 AM

वसई - विरार शहर महानगरपालिका, शेतकरी, नागरिक यांच्या विरोधानंतर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा वसईतील मार्ग खडतर झाला होता.

पारोळ : वसई - विरार शहर महानगरपालिका, शेतकरी, नागरिक यांच्या विरोधानंतर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा वसईतील मार्ग खडतर झाला होता. मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर बुलेट ट्रेनसाठी वसईतील जागेच्या मोजणीचे काम अखेर पूर्ण झाले. वसईतून सुमार ६९ गुंठे जागा आतापर्यंत संपादित करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.मुंबई - अहमदाबाद या दोन मुख्य शहरांना जोडणाºया बुलेट ट्रेन प्रकल्पाची रूपरेषा आखण्यात आल्यानंतर मुंबईला बुलेट ट्रेनची गरजच काय आहे? असा सवाल करत वसईकर नागरिकांनी मुंबईतील लोकल व्यवस्था सुधारण्याचे शहाणपण शासनाने दाखवावे, अशी कोपरखळी लगावली होती. नागरिकांचा, वसई-विरार शहर महानगरपालिकेचा विरोध असतानाही शासनाला या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यात यश आले आहे. सध्या ६९ गुंठे जागेचे संपादन झाले.मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातून जात आहे. प्रकल्पाला पालघर जिल्ह्यासह विविध भागांतून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. मात्र हळूहळू हा विरोध मावळत असून भूसंपादन करण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्याच्या ७३ गावांतून हा प्रकल्प जात असून त्यामध्ये वसईच्या २१ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांतील भूधारकांच्या गावनिहाय बैठका घेऊन विरोधाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण २८८ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामध्ये वसईच्या भागातून ३७ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. सध्या पालघर जिल्ह्यातील ७३ गावांपैकी ६२ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या व भूधारकांच्या संमतीने जमिनीची संयुक्त मोजणी केल्याची माहिती दिली.>बाधितांना वाºयावर सोडू नकाया प्रकल्पात बाधित होणाºया नागरिकांच्या पुनवर्सनाची जबाबदारी ही मुख्यत्वे शासनाची आहे. त्यामुळे प्रकल्प बाधितांना वाºयावर न सोडता त्यांच्या पुनवर्सनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.