शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

जमिनीची भरपाई २० वर्षे नाही, शेतकरी आले मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:46 IST

विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेलेली आहे़

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेलेली आहे़ व त्यावेळेस या टॉवरखाली जात असेल्या जमीन मालकांच्या जमीनीचे सपाटीकरण करुन ती संपादित करुन त्यावरील झाडे व इतर पिके जमीनदोस्त केली गेली व नोटीस बजावून नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते त्याला २० वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जमिनीची भरपाई मिळालेली नाही.याकरीता शेतक-यांनी अनेकवेळा कंपनीच्या कार्यालयात भरपाई मिळविण्यासाठी खेट्या घातल्या .मात्र त्यांना अदयापही एक छदामाचीही भरपाई मिळालेली नाही़ यामुळे शेतकरी मेटामुटीला आलेला आहे. अखेर सर्व शेतकरी एकत्र मिळुन आता त्यांनी दाद मागण्याकरीता जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे निवेदन दिलेले आहे़ आता तरी ही भरपाई मिळेल अशा आशेवर हे शेतकरी आहेत.दरम्यान याबात येथील शेतकºयांची संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, त्यावेळेस टॉवर लाईन टाकण्याकरीता आमच्या जमीनीत असलेली झाडे, झाडोरा, कलमे, पिके, जमीनदोस्त करुन जमीन संपादीत करण्यात आली व त्याप्रमाणे कंपनीकडून पंचनामा देखील केलेला आहे़आम्ही आमच्या जमिनीची भरपाई मिळावी यासाठी १९९४ पासून आमचे झालेले जमीनीचे नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कंपनीच्या कार्यालयात बोईसर , महागाव, कल्याण, वापी अशा ठिकाणच्या शेतक-यांच्या वतीने चंद्रकांत गोविंद घाटाळ, ़सिताराम सखाराम चव्हाण,अनंता देवु भोईर, काश्या कमळया घाटाळ यांनी दाद मागितली आहे. परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. ती तातडीने न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.>अनेक मान्यवरांना दिले निवेदनसंपादित केलेली जमीन ही आमची रोजीरोटी असल्याने व तिची भरपाई न देऊन आमची या कंपनीने फसवणूक केली आहे ़ आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करुन देखील कंपनी आमची दखल घेत नाही व थातूरमातूर उत्तरे देऊन आमची बोळावण केली जाते. आम्हांस आता तरी न्याय दयावा व आम्हांस भरपाई मिळावी याकरीता आम्ही एकत्रितरित्या जिल्हाधिका-यांना विनंती अर्ज सादर केला आहे़ व त्याच्या प्रति कारवाईसाठी पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे व्यवस्थापक व उप विभागीय अधिकारी वाडा, ़तहसिलदार विक्रमगड, तालुका पत्रकार संघ, यांना सादर केला आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरार